भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत

कांगारूंच्या भूमीत तिरंगा फडकवण्याची महिला संघाला संधी


ॲडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामधील टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत असून, शनिवारी होणारा तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारतीय महिलांकडे आहे.


मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवत जोरदार सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पलटवार करत १९ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोलने (८८ धावा) आणि बेथ मुनीने दिलेल्या १२८ धावांच्या सलामीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.


मागील सामन्यात भारताची मधली फळी गडगडल्याने विजयाची संधी हुकली होती. त्यामुळे उद्याच्या निर्णायक सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्याकडून आक्रमक सलामीची अपेक्षा आहे. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांना मोठी खेळी करावी लागेल. गोलंदाजीत रेणुका सिंग आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर सुरुवातीचे धक्के देण्याची जबाबदारी असेल.


विक्रमी हरमनप्रीतवर सर्वांच्या नजरा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५६ सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या हरमनप्रीत कौरसाठी हा सामना वैयक्तिकरीत्या खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी ती मालिका विजयासाठी जीवाचे रान करेल, यात शंका नाही.


सामन्याचा तपशील :
सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरी टी-२०)
 भारतीय वेळ : दुपारी १. ४५.
 स्थळ : ॲडलेड ओव्हल, ऑस्ट्रेलिया

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने

पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि

घटस्फोटाच्या मालिकेत अजून एका क्रिकेटरची भर; "मी हा चॅप्टर क्लोज करतोय" म्हणत क्रिकेटरने केली घटस्फोटाची घोषणा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात घटस्फोटांची मालिका सुरु आहे. अशातच आता या मालिकेत अजून एका

T20 World Cup 2026 : चालू स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाची जबाबदारी नवीन कर्णधारावर ?

मुंबई : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या थरारक सामन्यांना आजपासून सुरूवात होत आहे. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड

जाएंट किलर संघ भारताच्या वाट्याला...

अहमदाबाद  : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांची नजर 'सुपर-८' फेरीकडे लागली आहे. भारतीय

शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव