Cotton Procurement Scheme: मुख्यमंत्र्यांकडून कापूस खरेदी योजनेला मुदतवाढ; खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती

अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कापूस खरेदी योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे कापूस हंगाम २०२५-२६ च्या खरेदीस एप्रिल २०२६ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.


अकोला जिल्हा व राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ३५ लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भात कापूस वेचणी एप्रिल-मे महिन्यांत सुरू होते, परंतु यावर्षी कापसाची विक्री अधूरी राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक त्रास होण्याची भीती होती. सीसीआयने कापूस खरेदीसाठी अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित केली होती, मात्र लांबलेला वेचणी हंगाम लक्षात घेता मुदतवाढ करणे आवश्यक ठरले.


आमदार सावरकरांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्रींनी केंद्र सरकारकडे थेट मागणी केली आणि सीसीआयला एप्रिल २०२६ अखेरपर्यंत खरेदी प्रक्रिया चालू ठेवण्याचे सुचविले.


शेतकऱ्यांकडून अद्याप कापसाची विक्री पूर्ण न झाल्याने आणि खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती लक्षात घेऊन ही पावले घेतली गेली आहेत.

Comments
Add Comment

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालखी महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

सोलापूर : सोलापूर जिल्हा (Solapur News) हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गाभारा मानला जातो. येथे श्री विठ्ठल