Cotton Procurement Scheme: मुख्यमंत्र्यांकडून कापूस खरेदी योजनेला मुदतवाढ; खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती

अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कापूस खरेदी योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे कापूस हंगाम २०२५-२६ च्या खरेदीस एप्रिल २०२६ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.


अकोला जिल्हा व राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ३५ लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भात कापूस वेचणी एप्रिल-मे महिन्यांत सुरू होते, परंतु यावर्षी कापसाची विक्री अधूरी राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक त्रास होण्याची भीती होती. सीसीआयने कापूस खरेदीसाठी अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित केली होती, मात्र लांबलेला वेचणी हंगाम लक्षात घेता मुदतवाढ करणे आवश्यक ठरले.


आमदार सावरकरांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्रींनी केंद्र सरकारकडे थेट मागणी केली आणि सीसीआयला एप्रिल २०२६ अखेरपर्यंत खरेदी प्रक्रिया चालू ठेवण्याचे सुचविले.


शेतकऱ्यांकडून अद्याप कापसाची विक्री पूर्ण न झाल्याने आणि खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती लक्षात घेऊन ही पावले घेतली गेली आहेत.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध