शिवरायांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणमध्ये अध्यासन केंद्र - मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; शासनाकडून विशेष निधी मंजूर

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार असून, हे अध्यासन मालवणात स्थापन होणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.


या निधीमधून सिद्ध होणारे अध्यासन केंद्र ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण अशा बहुआयामी उपक्रमांसाठी कार्य करणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागातील ऐतिहासिक दाखल्यांचा सखोल अभ्यास होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन हातभार लावेल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला आहे.



पालकमंत्री नितेश राणे यांचा पुढाकार


ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला १२ एप्रिल २०२५ ला ३५८ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या गडावरील सांस्कृतिक कार्यक्रमात आशिष शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली होती. पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप प्रदेश सचिव प्रमोद जठार, भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, यांनी याबाबत मालवणमधील तज्ज्ञांशी चर्चा करून सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याचा अभ्यास करून शासनाने या अध्यासनाची रचना केली आहे.



५० लाखांचा निधी मंजूर


- सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांची माहिती आणि इतिहास मोठ्या प्रमाणात जनतेसमोर येणे आवश्यक असून, या किल्ल्यांवर अद्याप सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. या संदर्भातील सर्व ऐतिहासिक कागदपत्रे आणि दस्तावेज जमा करून त्यावर संशोधन करावे लागणार आहे. या ठिकाणी असलेल्या 'व्यापाराच्या बेटा'बाबतचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. त्यानुसार, सांस्कृतिक कार्य विभागाकडून मुंबई विद्यापीठात या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक 'अध्ययन केंद्र' सुरू करण्यात येत असून, त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


- जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन देश व राज्य घडवण्यासाठी या विषयाचा अभ्यास करावा, हा यामागचा उद्देश आहे. हा अभ्यास करण्यासाठी युवकांना स्वतःच्या खिशातून कोणताही निधी खर्च करावा लागणार नाही, अशी प्राथमिक सुविधा घोषित करत असल्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शिवजयंतीच्या पर्वावर महसूलमंत्र्यांची महत्वाकांक्षी घोषणा

एका दिवसात निकाली काढणार पंधरा महसूल सेवा * 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर * राज्यातील सर्व मंडल,

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील कंत्राटदाला ५० लाखांचा दंड

दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूलाच्या कामांत दिरंगाई मुंबई (विशेष

कन्नमवार नाल्याची भिंत उभारण्याचा मार्ग मोकळा, ३९ बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे

मुंबईत भव्य प्रवेशव्दार व क्लॅाकटॅावर उभारा, महापौर रितू तावडे यांनी आयुक्तांना सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत

अजित पवरांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप VIRALकरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - सुनिल तटकरे

मुंबई :  काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी अजित पवरांच्या आवाजात खोटी, दिशाभूल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट ...आणि नंदनवनमध्ये फुलल्या कलाप्रेमींच्या गप्पा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' बंगल्याने आज एका वेगळ्या