Mumbai: महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड भरावा लागणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांना दंड ठोठावला आहे. या दोन अधिकाऱ्यांना म्हणजे अतिरिक्त उपायुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव यांना न्यायालयाने प्रत्येकी ११ रुपयांचा दंड केला आहे. हा दंड त्यांच्या मासिक वेतनातून दोन दिवसात कट करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर आणि न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबावर उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना न्यायालयाने प्रत्येकी ११ रुपयांचा प्रतिकात्मक दंड ठोठावला आहे.


​फोर्ट परिसरातील एका इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दोन वेळा दिले होते. परंतु, पालिकेच्या वतीने या आदेशांचे पालन करण्यास वारंवार विलंब करण्यात आला. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने यावेळी दिला.


​विशेष म्हणजे, हा दंड या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून येत्या दोन दिवसात कापून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. "केवळ अकरा रुपये का?" असा प्रश्न उपस्थित होत असताना, न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, दंडाची रक्कम महत्त्वाची नसून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायलाच हवी, हा संदेश पालिकेच्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचावा, हाच आमचा मूळ हेतू आहे.

Comments
Add Comment

शिवरायांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणमध्ये अध्यासन केंद्र - मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; शासनाकडून विशेष निधी मंजूर

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल

व्हीएसआर' कंपनीला वाचवण्यासाठी मिलीभगत?  - रोहित पवार यांचा गंभीर आरोप; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा नवे

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी

स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध?

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल

मुंबईतील कमर्शियल झोपड्यांकडून ७० टक्के मालमत्ता कराची वसूली

मुंबई: मुंबईतील पात्र झोपड्या महापालिकेच्या मालमत्ता कराच्या कक्षेत येत नसल्या तरी अनेक झोपड्यांच्या जागांचा

दादरकरांनी, अतिक्रमणमुक्त पदपथ आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाचे केले कौतुक

महापालिका अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठवून व्यक्त केले समाधान मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील काही प्रमुख