Nitesh Rane : ठाण्यातील 'मालवणी महोत्सवा'त मंत्री नितेश राणे यांची हजेरी; स्टॉलला भेट देऊन ग्राहकांशी साधला संवाद

ठाणे : ठाणे शहरात सध्या मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या 'मालवणी महोत्सवा'ला मंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावून महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सीताराम राणे यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर संपूर्ण महोत्सवात फिरून कोकणी कला आणि खाद्यसंस्कृतीची पाहणी केली.





मंत्री नितेश राणे यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांशी आणि विक्रेत्यांशी आपुलकीने चर्चा केली. कोकणी उत्पादने, मालवणी मसाले आणि खाद्यपदार्थांची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. नितेश राणे आणि सीताराम राणे यांचे महोत्सवाच्या ठिकाणी आगमन होताच त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोठी गर्दी पाहायला मिळाली. महोत्सवाच्या मुख्य स्टेजवर नितेश राणे यांचे आयोजन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी संयोजकांनी त्यांचे आभार मानले आणि महोत्सवाचा गौरव वाढवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नितेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधताना मालवणी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. ठाणेकरांनी या महोत्सवाला दिलेला प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.



या महोत्सवात मालवणी खाद्यपदार्थ, कोकणातील हस्तकला आणि पारंपारिक वस्तूंनी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भेटीमुळे महोत्सवात एक वेगळाच उत्साह संचारला होता, तसेच नागरिकांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Comments
Add Comment

इस्लामाबाद चर्चा अनिर्णित, इराणचे परराष्ट्रमंत्री चर्चा न करताच परतले, अमेरिकेचा पाकिस्तान दौरा रद्द

इस्लामाबाद : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात

Punjab Kings : पंजाबचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय, सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी