सुनेत्रा, पार्थ पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

- अजित पवारांच्या विमान अपघाताची 'सीबीआय'मार्फत चौकशी करण्याची मागणी


मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची 'सीबीआय'मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक सविस्तर निवेदन देण्यात आले.


या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि युवा नेते पार्थ पवार उपस्थित होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार सुनील तटकरे यांनी माहिती दिली की, "अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला, त्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे".


दरम्यान, या निवेदनाची दखल घेत राज्य सरकार उद्या केंद्र सरकारकडे या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यासंदर्भात केंद्र सरकारशी आवश्यक तो पत्रव्यवहार करतील आणि त्यादृष्टीने पावले उचलली जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

महाराष्ट्रात दोन अर्ज बाद ठरल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. गुरुवारी

इंधन तुटवड्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावी मुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांचे निलंबन मागे

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

हुंडाबंदी कायदा अधिक कठोर होणार, राज्यमंत्री पंकज भोयरांनी दिली ग्वाही

मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या हुंडाबळी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला.