Nagpur Accident: कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, भर रस्त्यात करुण अंत

नागपूर: नागपूर शहरातील दोन तरुण कबड्डीपटूंना बुलेट वरून स्टंटबाजी करणं महागात पडलं आहे. या स्टंटबाजीमुळे दोन्ही खेळाडूंना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे शहरात सध्या सर्वत्र काळजी आणि संतापाचं वातावरण आहे.


वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौक दरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काल रात्री (१६ फेब्रुवारी) सुमारे ११ ते १२ च्या दरम्यान जीटी बुलेटवर स्वार असलेले दोन युवक वारंवार चौकातून वेगात फेऱ्या मारताना दिसत होते. सिग्नलचे पालन न करता त्यांनी दोन वेळा जनता चौक ते बजाजनगर या मार्गावरून सतत स्टंटबाजी केली. विष्णूजी की रसोईसमोरून जात असताना त्यांनी एका महिला दुचाकीस्वाराला कट मारला आणि त्यांचा बुलेटवरील ताबा सुटला आणि बुलेट रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या पिलरवर आदळली.


या अपघातात १९ वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर, दोघेही रा. काचीपुरा, गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांनी वर्धा मार्गावर रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा

राज्यातील प्रलंबित मुद्रांक प्रकरणांचा निपटारा जलद; 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' मंजूर

मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली