Nagpur Accident: कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, भर रस्त्यात करुण अंत

नागपूर: नागपूर शहरातील दोन तरुण कबड्डीपटूंना बुलेट वरून स्टंटबाजी करणं महागात पडलं आहे. या स्टंटबाजीमुळे दोन्ही खेळाडूंना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे शहरात सध्या सर्वत्र काळजी आणि संतापाचं वातावरण आहे.


वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौक दरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काल रात्री (१६ फेब्रुवारी) सुमारे ११ ते १२ च्या दरम्यान जीटी बुलेटवर स्वार असलेले दोन युवक वारंवार चौकातून वेगात फेऱ्या मारताना दिसत होते. सिग्नलचे पालन न करता त्यांनी दोन वेळा जनता चौक ते बजाजनगर या मार्गावरून सतत स्टंटबाजी केली. विष्णूजी की रसोईसमोरून जात असताना त्यांनी एका महिला दुचाकीस्वाराला कट मारला आणि त्यांचा बुलेटवरील ताबा सुटला आणि बुलेट रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या पिलरवर आदळली.


या अपघातात १९ वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर, दोघेही रा. काचीपुरा, गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांनी वर्धा मार्गावर रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Pune News : ७ वर्षीय चिमुरडीला खोलीत बोलावून...नराधमाचा 'तो' संतापजनक प्रकार पाहून आई अन् आत्याला...

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) मोशी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

भोंदूबाबा अशोक खरातने हवालाद्वारे पाच देशांत पाठवले हजारो कोटी?, रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवतीचा चौकशीचा फास अधिक

Devendra Fadnavis: 'बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राजकीय मतभेद बाजूला ठेवून बारामती विधानसभा मतदारसंघाची

Nashik Accident : दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू

Nashik Accident : भरधाव कार थेट विहिरीत पडून ९ जणांचा हृदयद्रावक अंत

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.