हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'विशेष टपाल तिकीट' जारी करा

माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी


मुंबई: वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, 'विशेष टपाल तिकीट' जारी करण्याची मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना शेवाळे यांनी दिलेल्या लेखी निवेदनाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.


आपल्या निवेदनात शेवाळे यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा उल्लेख केला आहे. १९६० च्या दशकापासून पुढची ५० वर्षे बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक हिंदुत्ववादी लोकनेता, महान व्यंगचित्रकार, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता अशा विविध रूपांत बाळासाहेबांनी नेहमीच आपली भूमिका परखडपणे मांडली. त्यांची लेखणी, त्यांची भाषणे आणि त्यांच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागविले, असेही शेवाळे यांनी निवेदनात लिहिले आहे.


नुकतीच, २७ जानेवारी रोजी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती देशभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वंदनीय बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही देशभरातील लाखो चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा, अशी मागणी शेवाळे यांनी निवेदनातून केली आहे.



काय म्हणाले राहुल शेवाळे ?


"माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे एक स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या परखड हिंदुत्ववादी विचारांनी देशभरातील सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट जारी करून शिवसेनाप्रमुखांना अनोखी आदरांजली द्यावी, अशी मागणी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच भारतीय टपाल विभागाकडून अशा प्रकारचे विशेष टपाल तिकीट जारी केले जाईल, याची मला खात्री आहे."

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा