India AI Impact Summit 2026: 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'चा उद्देश हा सर्वांच्या हितासाठीच - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: दिल्ली येथे आयोजित पाच दिवसीय इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६च्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या शिखर परिषदेचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सर्वांच्या हितासाठी कसा करता येईल हे शोधणे आहे.


पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले, “बुद्धिमत्ता, तर्कशुद्धता आणि निर्णयक्षमता विज्ञान व तंत्रज्ञानाला जनतेसाठी उपयुक्त बनवतात. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचा उद्देश एआयचा उपयोग सर्वांच्या फायद्यासाठी कसा करता येईल हे शोधणे हा देखील आहे.”



अनेक मान्यवर एकाच व्यासपीठावर उपस्थित होणार:


१६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख, मंत्री, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, प्रख्यात संशोधक, बहुपक्षीय संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील हितधारक एकाच व्यासपीठावर आले आहेत. समावेशक विकासाला चालना देणे, सार्वजनिक यंत्रणा बळकट करणे आणि शाश्वत विकासाला गती देण्यासाठी एआयची भूमिका काय असू शकते यावर चर्चा करणे हा यामागील उद्देश आहे. या विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक परिषद ‘ग्लोबल साऊथ’मध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.





१०० हून अधिक सरकारी प्रतिनिधींचा सहभाग:


२० फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या पाच दिवसीय परिषदेत १०० हून अधिक सरकारी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये २० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख तसेच ६० मंत्री व उपमंत्री यांचा समावेश आहे. याशिवाय सीईओ, संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, सीटीओ आणि परोपकारी संस्थांचे प्रतिनिधी अशा ५०० हून अधिक जागतिक एआय क्षेत्रातील नेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण देणार असून ते जागतिक सहकार्याची दिशा निश्चित करतील आणि एआयबाबत भारताचा दृष्टिकोन मांडतील.

Comments
Add Comment

Heavy Rain India : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; झारखंड-उत्तर प्रदेशात वीज कोसळून 16 जणांचा मृत्यू

Heavy Rain India : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी

Vehicle Insurance : गाडी चालवणाऱ्यांची धाकधूक वाढली! आता पेट्रोल पंपावर होणार 'ही' मोठी तपासणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली : रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, वैध विमा

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन

Faridabad Teacher Murder : बाप रे...३२ सेकंदात ३४ सपासप वार करून महिलेची निर्घृण हत्या; सर्व घटना CCTV मध्ये कैद, फरिदाबाद हादरले!

फरिदाबाद : एका बाजूला पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना, दुसऱ्या बाजूला विद्यादानाच्या पवित्र भूमीत

Punjab Terror Plot : पंजाबमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला! ISI शी संबंध असणाऱ्या चार अल्पवयीनांसह ९ जण जेरबंद

चंदीगड : पंजाबमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Punjab Terror Plot) घडवून आणण्याचा कट पंजाब पोलिसांनी वेळेत उधळून लावत मोठी कारवाई

Chandipura Virus : गुजरातमध्ये 'चांदीपुरा' व्हायरसचा धुमाकूळ! २२ बालकांचा मृत्यू, १८४ संशयित रुग्ण; जाणून घ्या काय आहेत धोक्याची लक्षणे ?

गांधीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत गुजरात राज्यात एका अत्यंत घातक आणि प्राणघातक आजाराने थैमान घातले आहे.