India AI Impact Summit 2026: 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'चा उद्देश हा सर्वांच्या हितासाठीच - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: दिल्ली येथे आयोजित पाच दिवसीय इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६च्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या शिखर परिषदेचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सर्वांच्या हितासाठी कसा करता येईल हे शोधणे आहे.


पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले, “बुद्धिमत्ता, तर्कशुद्धता आणि निर्णयक्षमता विज्ञान व तंत्रज्ञानाला जनतेसाठी उपयुक्त बनवतात. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचा उद्देश एआयचा उपयोग सर्वांच्या फायद्यासाठी कसा करता येईल हे शोधणे हा देखील आहे.”



अनेक मान्यवर एकाच व्यासपीठावर उपस्थित होणार:


१६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख, मंत्री, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, प्रख्यात संशोधक, बहुपक्षीय संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील हितधारक एकाच व्यासपीठावर आले आहेत. समावेशक विकासाला चालना देणे, सार्वजनिक यंत्रणा बळकट करणे आणि शाश्वत विकासाला गती देण्यासाठी एआयची भूमिका काय असू शकते यावर चर्चा करणे हा यामागील उद्देश आहे. या विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक परिषद ‘ग्लोबल साऊथ’मध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.





१०० हून अधिक सरकारी प्रतिनिधींचा सहभाग:


२० फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या पाच दिवसीय परिषदेत १०० हून अधिक सरकारी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये २० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख तसेच ६० मंत्री व उपमंत्री यांचा समावेश आहे. याशिवाय सीईओ, संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, सीटीओ आणि परोपकारी संस्थांचे प्रतिनिधी अशा ५०० हून अधिक जागतिक एआय क्षेत्रातील नेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण देणार असून ते जागतिक सहकार्याची दिशा निश्चित करतील आणि एआयबाबत भारताचा दृष्टिकोन मांडतील.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी