Harshvardhan Sapkal : मी तुलना केलीच नव्हती मात्र...अखेर शिवरायांच्या अपमानावरून हर्षवर्धन सपकाळांची माफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अखेर नमते घ्यावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या राज्यव्यापी एल्गारानंतर आणि शिवप्रेमींच्या तीव्र आंदोलनासमोर सपकाळ यांनी हात जोडत आपली दिलगिरी व्यक्त केली. "ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो," असे म्हणत सपकाळ यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.



भाजपचा आक्रमक पवित्रा आणि सपकाळांची सारवासारव


काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. टिपू सुलतानसारख्या वादग्रस्त व्यक्तीचा आदर्श छत्रपती शिवरायांशी जोडणे, हा केवळ महाराजांचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला घाला आहे, अशी भूमिका भाजपने मांडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आणि इतर शहरांत रस्त्यावर उतरून सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या वाढत्या दबावामुळे सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले की, "मी तुलना केलीच नव्हती, माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला." मात्र, भाजपने याला काँग्रेसची नेहमीची 'यु-टर्न' घेण्याची पद्धत म्हटले आहे.



"टिपू सुलतानांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही"


सपकाळ यांनी आपल्या स्पष्टीकरणात टिपू सुलतानांचा उल्लेख संविधानातील प्रतिमेचा दाखला देत केला आणि त्यांना शिवरायांकडून प्रेरणा घेणारे म्हटले. यावर भाजप नेत्यांनी पलटवार केला आहे. "हिंदूंचे दमन करणाऱ्या टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करण्यासाठी शिवरायांच्या नावाचा आधार घेणे हे काँग्रेसचे दिवाळखोर वैचारिक धोरण आहे," अशी टीका भाजपकडून करण्यात आली. धर्मांतराचे आणि अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची तुलना स्वराज्याच्या संस्थापकांशी करणे ही शिवद्रोहाचीच कृती असल्याचे भाजपने ठामपणे सांगितले.



धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव?


सपकाळ यांनी उलट भाजपवरच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला असला, तरी भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. "लोकांच्या भावना भडकवणारी वक्तव्ये काँग्रेसचे नेते करतात आणि जेव्हा जनता जाब विचारते, तेव्हा भाजपवर खापर फोडतात," असा टोला भाजप प्रवक्त्यांनी लगावला. अखेर जनरेटा आणि शिवप्रेमींचा रोष पाहता सपकाळ यांना माफी मागावी लागली, हा भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि शिवरायांच्या सन्मानाचा विजय असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे