निवृत्ती घेतलेल्याना लाभ मिळणार की नुकसान होणार?; आयोगाबाबत केंद्राचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेतून २०२५ अखेरपर्यंत निवृत्त झालेल्यांना नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार नाहीत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत कोणतीही कपात किंवा भेदभाव होणार नसल्याचे सांगितले आहे.



केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती


केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सध्याचा आठवा वेतन आयोग हा केंद्रातील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनरचनेचा आणि भत्त्यांचा सर्वांगीण आढावा घेणार आहे. अर्थसंकल्प २०२५ मधील तरतुदींमुळे सध्या लागू असलेल्या पेन्शन नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नागरी तसेच संरक्षण क्षेत्रातील माजी कर्मचाऱ्यांनाही समान तत्त्वांवर लाभ लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.



शिफारशींसाठी तुम्ही इथे आपले मत नोंदवू शकता


आयोगाच्या कामकाजासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून नागरिक सहभागासाठी MyGov या मंचाद्वारे मते मागवण्यात येत आहेत. वेतनवाढ, भत्त्यांची पुनर्रचना, तसेच निवृत्तिवेतनातील सुधारणा याबाबत सूचना नोंदवता येणार आहेत.



सहभागाची मुदत


संबंधित अभिप्राय १६ मार्चपर्यंत सादर करता येणार असून कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक तसेच इच्छुक नागरिकांना प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. शासनाच्या मते, जास्तीच्या सहभागामुळे आयोगाच्या शिफारशी अधिक सर्वसमावेशक ठरतील.



निवृत्तिवेतनधारकांबाबत स्पष्टता


३१ डिसेंबर २०२५ पूर्वी सेवामुक्त झालेल्यांनाही आयोगाच्या अंतिम शिफारशी लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिफारशी मंजूर झाल्यानंतर सर्वसाधारण आदेशाद्वारे त्यांची अंमलबजावणी होईल. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे. या स्पष्टीकरणानंतर कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

मुंबई : झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदारकीची शपथ घेतली.

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व