निवृत्ती घेतलेल्याना लाभ मिळणार की नुकसान होणार?; आयोगाबाबत केंद्राचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेतून २०२५ अखेरपर्यंत निवृत्त झालेल्यांना नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार नाहीत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत कोणतीही कपात किंवा भेदभाव होणार नसल्याचे सांगितले आहे.



केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती


केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सध्याचा आठवा वेतन आयोग हा केंद्रातील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनरचनेचा आणि भत्त्यांचा सर्वांगीण आढावा घेणार आहे. अर्थसंकल्प २०२५ मधील तरतुदींमुळे सध्या लागू असलेल्या पेन्शन नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नागरी तसेच संरक्षण क्षेत्रातील माजी कर्मचाऱ्यांनाही समान तत्त्वांवर लाभ लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.



शिफारशींसाठी तुम्ही इथे आपले मत नोंदवू शकता


आयोगाच्या कामकाजासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून नागरिक सहभागासाठी MyGov या मंचाद्वारे मते मागवण्यात येत आहेत. वेतनवाढ, भत्त्यांची पुनर्रचना, तसेच निवृत्तिवेतनातील सुधारणा याबाबत सूचना नोंदवता येणार आहेत.



सहभागाची मुदत


संबंधित अभिप्राय १६ मार्चपर्यंत सादर करता येणार असून कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक तसेच इच्छुक नागरिकांना प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. शासनाच्या मते, जास्तीच्या सहभागामुळे आयोगाच्या शिफारशी अधिक सर्वसमावेशक ठरतील.



निवृत्तिवेतनधारकांबाबत स्पष्टता


३१ डिसेंबर २०२५ पूर्वी सेवामुक्त झालेल्यांनाही आयोगाच्या अंतिम शिफारशी लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिफारशी मंजूर झाल्यानंतर सर्वसाधारण आदेशाद्वारे त्यांची अंमलबजावणी होईल. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे. या स्पष्टीकरणानंतर कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे