शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे शरसंधान


स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव्ह करणारे उद्धव ठाकरे 3 दिवस उलटले तरी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार नाही, हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरेंची दातखीळ बसली आहे का? छत्रपतींचा अवमान होत असताना उद्धव ठाकरे यांनी निषेध का केला नाही असे परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केले. उद्धव ठाकरेंमध्ये स्वाभिमान, थोडी जरी धमक शिल्लक असेल तर उबाठा गटाने हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करावे असे आव्हान बन यांनी दिले.


टिपू सुलतानवरून भाजपावर टीका करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत बन म्हणाले की, भाजपाचे धोरण स्पष्ट आहे. जो या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करतो, हिंदू मंदिरांची तोडफोड करतो, हिंदू आया बहिणींवर ज्याने बलात्कार केले, त्या टिपू सुलतानचे समर्थन भाजपा कधीच करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना मालवणी मध्ये पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न केला होता. त्याची आठवण करून देत  बन म्हणाले त्यावेळी या विरोधात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजपा नेते मंगल प्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर, तेजिंदर तिवाना यांनी प्रखर विरोध केला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या पण त्या मैदानाला टिपू सुलतानचे नाव देऊ दिल नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आंदोलन करणा-या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे हीन काम केलं होते असे टीकास्त्र  बन यांनी सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना संजय राऊत त्याचा संबंध निवडणुकांशी जोडायचा घाणेरडा प्रयत्न करत आहेत, राजकारण करत आहेत. भाजपासाठी शिवरायांचा अपमान हा निवडणुकीचा विषय नाही, अस्मितेचा विषय आहे. निवडणूक पाहून आंदोलन करणे भाजपाच्या तत्वात बसत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांचा सन्मान राखू असे  बन यांनी निक्षून सांगितले.


सपकाळांनी महाराष्ट्राची माफी मागावी


छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा कदापि सहन करणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन अटळ आहे असा इशारा बन यांनी दिला.


मनी लॉन्ड्रिंगमध्ये काँग्रेस एक्सपर्ट


मनी लॉन्ड्रींग करण्याचे उद्योग कर्नाटक सरकार करत आहे तसेच केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार होते तेव्हाही मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यांचे प्रकार उघडकीस आले होते. काळा पैसा पांढरा कसा झाला हे मल्लिकार्जून खरगे यांनी चिदंबरम यांना विचारायला हवे असा टोलाही  बन यांनी लगावला.


भाजपाच्या गणेश नाईकांना त्यांनी पुन्हा शिवसेनेत परतावे असा सल्ला देणा-या राऊतांना सणसणीत चपराक मारत बन म्हणाले की, राऊत आपली खासदारकी संपली की खासदारकीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लाऊन बसणार आहेत हे महाराष्ट्राला देखील माहीत आहे.


पहलगाम हल्ल्यामध्ये पुण्याचे रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा महायुती सरकार संवेदनशील असून लवकरच त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचा भाजपाचा निर्धार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने नोकरी देण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे बन म्हणाले .

Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय