Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२० विश्वचषक २०२६ चा २७ वा लीग सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना ६१ धावांनी जिंकला. भारताच्या विजयानंतर, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक महत्त्वपूर्ण विधान केले, ज्यात त्याने म्हटले की भारत विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता. अख्तरने त्याच्या स्वतःच्या देशाबद्दल म्हणजेच पाकिस्तानबद्दलही एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.



'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता'


एका वृत्तवाहिनीवर बोलताना अख्तर म्हणाला, "तुम्ही भारतीय असाल किंवा पाकिस्तानी, तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे. जर कोणताही संघ ते थांबवू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल."



'सामन्यात पाकिस्तान कुठेही नव्हता'


अख्तर पुढे म्हणाला, "पाहा, पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला, त्यात पाकिस्तान कुठेही नव्हता. आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीच्या २३ धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज आहे. तो १२५ (किमी प्रतितास) वेगाने गोलंदाजी करत आहे."



'आधुनिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान खूप मागे'


अख्तर यांनी यावर भर दिला की, पाकिस्तान कोणत्याही प्रकारे आधुनिक क्रिकेट खेळत नाही. ते पुढे म्हणाले, "पाकिस्तान जे खेळत आहे, ते आधुनिक क्रिकेट नाही. भारत पुढील १०० वर्षे किंवा ५० वर्षे क्रिकेट खेळत आहे. पाकिस्तान खूप खराब क्रिकेट खेळत आहे आणि या फॉरमॅटमध्ये (टी२० आंतरराष्ट्रीय) खूप मागे आहे."

Comments
Add Comment

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा