नाशिक मनपाच्या स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

नाशिक : नाशिक महापालिकेच्या सर्व स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना सादर करण्यात आली. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्यामुळे सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरांनी निवड झालेल्या सदस्यांच्या घोषणेची औपचारिकता केली आणि स्थायी समितीवर नव्या सदस्यांचे स्वागत केले.


महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. या घोषणेनुसार नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाच्या अर्थात भाजपच्या नऊ जणांची तर शिवसेनेच्या चार जणांची, उबाठाच्या दोन जणांची आणि राष्ट्रवादीच्या एकाची निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली आहे तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना शिवसेनेकडून स्थायी समितीवर संधी मिळाली आहे.


नाशिक महापालिका स्थायी समिती सदस्य




  1. भाजप : माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप

  2. शिवसेना : मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे

  3. राष्ट्रवादी काँग्रेस : मुकेश शहाणे (अपक्ष)

  4. उबाठा : योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे

  5. मनसेच्या मयुरी पवार यांनी शिवसेना नगरसेवकांसोबत नोंदणी केल्यामुळे त्यांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळाली आहे.

Comments
Add Comment

Violent clash at Gurudwara in Germany : जर्मनीतील गुरुद्वारात दोन गटांमध्ये हिंसक झटापट, ११ जण जखमी

जर्मनीतील मोर्स शहरातील ड्यूसबर्ग भागात असलेल्या एका गुरुद्वारात दोन गटांमध्ये अचानक हिंसक झटापट झाली. या

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची धुरा

- महाराष्ट्र भाजपकडून जिल्हानिहाय प्रभारी जाहीर मुंबई : संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने

CM Devendra Fadnavis : 'अर्बन नक्षलवाद’ आणि अराजकता पसरवणाऱ्या शक्तींना युवाशक्तीच रोखणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभ मुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि

Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

- ‘मुंबई ३.०’साठी कनेक्टिव्हिटीचे जाळे; जोडमार्गाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्णत्वाकडे मुंबई : मुंबई आणि पुणे या

Navi Mumbai- Panvel : नवी मुंबई–पनवेलमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, पण नागरिकांची तारांबळ

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.