Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

कल्याण : कल्याण शहराच्या (Kalyan) ऐतिहासिक वारशाचा (Heritage) महत्त्वाचा भाग असलेल्या भटाळे तलावाच्या (Bhatale Lake) पुनरुज्जीवन (Rejuvenation), सुशोभीकरण (Beautification) आणि सर्वांगीण विकासासाठी (Development) १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन (Memorandum) सादर केले. यावेळी त्यांनी भटाळे तलावाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय (Environmental) महत्त्व अधोरेखित करत त्याच्या जतन आणि संवर्धनाची आवश्यकता मांडली.



निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला भटाळे तलाव हा कल्याणच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या तलावाचे मूळ स्वरूप कालांतराने मोठ्या प्रमाणावर झालेल्या भरावामुळे आणि अतिक्रमणामुळे नष्ट होत चालले असून, आज तलाव शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


तसेच तलाव परिसरात बेकायदा बांधकामे वाढत असून जनावरांचे मलमूत्र आणि सांडपाणी (Sewage) तलावात सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण (Pollution) वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणीय संतुलनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


इतिहास आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भटाळे तलावासाठी सर्वंकष विकास आराखडा (Master Plan) तयार करून पुनरुज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणीही नरेंद्र पवार यांनी केली. यासाठी राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून भटाळे तलावाच्या विकासाची कामे तातडीने सुरू करावीत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत