Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. देशाला “विकसित भारत” बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्राने नवोन्मेष, क्षमता वाढ आणि जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी धाडसी गुंतवणूक करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


रविवार १५ फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने ‘शब्दांमध्ये आणि भावनेतही’ सुधारणा (रिफॉर्म) यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते, धोरणातील सातत्य आणि निर्णायक नेतृत्वामुळे देशात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. त्यांनी म्हटले की, उत्पादकता वाढल्यावर खासगी क्षेत्रातील मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर नफा न्याय्य पद्धतीने वाटून घ्यावा. तसेच उद्योगांनी कमी नफा सुरक्षित ठेवण्यावर भर न देता संशोधन व विकास (R&D), पुरवठा साखळी आणि गुणवत्तेत अधिक गुंतवणूक करावी.



डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल:


मोदी पुढे म्हणाले की; भारताचे मुक्त व्यापार करार (FTA) अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की टेक्सटाईल, लेदर, केमिकल्स, हस्तकला आणि रत्न यांसारख्या क्षेत्रातील एमएसएमई उद्योगांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. त्यांनी म्हटले की भारत आज डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. व्यवहार करण्याच्या पद्धतीत झालेल्या मोठ्या बदलांमुळे, विशेषतः युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) प्लॅटफॉर्ममुळे हे शक्य झाले आहे.


त्यांनी पुढे सांगितले की डेटा सेंटर्समुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. भारत जगभरातील डेटा साठवण्यासाठी तयार आहे. तसेच देशात संगणकीय क्षमता आणि डेटा सेंटर पायाभूत सुविधा वाढवून मजबूत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) परिसंस्थेची पायाभरणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न:


संरक्षण क्षेत्राबाबत पंतप्रधानांनी सांगितले की बदलत्या परिस्थितीनुसार सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि देशाची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की राजकीय स्थिरता आणि धोरणात्मक स्पष्टतेमुळे गुंतवणूकदारांचा भारतावर पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या सरकारचा प्रत्येक निर्णय महिलांच्या कल्याणाचा विचार करून घेतला जातो आणि ‘विकसित भारत’ घडवण्यात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

Comments
Add Comment

Cbse Starts Digital Answer Sheet : उत्तरपत्रिका तपासणीत AI ची दणक्यात एंट्री! आता तुमची उत्तरं 'मशीन' वाचणार; CBSE चा नवा बदल वाचा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यंदाच्या १२वीच्या परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत एक

Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे

Iran Israel War, Tehran : तेहरानजवळील निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला, १३ जणांचा मृत्यू

तेहरान : सोमवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इस्लामशहरजवळ एका निवासी इमारतीवर

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही