टिपूचे उदात्तीकरण कराल तर... नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात... ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिरं तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्याकडे लक्ष दिले..
तो आमच्या शिवरायांच्या जवळपास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवावे मग बघू... शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? हर हर महादेव! अशी एक्स पोस्ट मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एक्स पोस्ट करून नितेश राणेंनी हा इशारा दिला आहे.


मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर समाजवादी पक्षाच्या निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे फोटो काढून धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा फोटो लावला. यावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी टिपूचे उदात्तीकरण केले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. भाजपनेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाष्याचा निषेध केला. आता मंत्री नितेश राणे यांनी तर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना निर्वाणीचा इशाराच दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना खपवून घेतली जाणार नाही. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे अतिशय निंदनीय आहे. कॉंग्रेसला लाज वाटायला पाहिजे. जोडे चाटण्याची ही पद्धत जन्मात पाहिली नाही. छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतानची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान देणे म्हणणे म्हणजे जोडे चाटणे या जन्मात बघितले नाही. हे खपवून घेतले जाणार नाही. या तुलनेसाठी सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर हिंदुद्वेषी आणि क्रूर टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून काँग्रेसने आपली ‘मुघली विचारधारा’ महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. निष्पाप हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदू स्त्रियांचा छळ करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केली पाहिजे, असे विधान काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले आहे. गेल्याच आठवड्यात तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर बुलडोझर फिरवला होता. पंडित नेहरूंपासून आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करण्याची मुघली परंपरा काँग्रेस पुढे नेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या औरंगजेबप्रेमी काँग्रेसला जनता नक्कीच धडा शिकवणार, अशी टीका भाजपने केली आहे. पाठोपाठ मंत्री नितेश राणे यांनी टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना सुनावले आहे.


टिपूने शेकडो निष्पाप ब्राह्मणांना फासावर लटकवले. हजारो हिंदू मंदिरांचा विध्वंस करून तिथे मशिदी उभारल्या. लाखो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले. हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना आपल्या जनानखान्यात डांबले. अशा 'हिंदुद्वेषी' आक्रमकाचे उदात्तीकरण करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी समजेल अशा भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवा मग बघा शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? असे सांगत मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.


Comments
Add Comment

इस्लामाबाद चर्चा अनिर्णित, इराणचे परराष्ट्रमंत्री चर्चा न करताच परतले, अमेरिकेचा पाकिस्तान दौरा रद्द

इस्लामाबाद : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात

Punjab Kings : पंजाबचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय, सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी