Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग; संघटनात्मक बदल करणार

राज्यभरातील ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली


मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग आली असून, संघटनात्मक पातळीवर व्यापक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये सन्मानजनक कामगिरी करण्यात अपयश आल्याने राज्यभरातील तब्बल ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते.


लोकसभा निवडणुकीत १४ जागा जिंकत काँग्रेसने राज्यात पुनरागमनाचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसला. परिणामी, संघटना बळकट करण्यावर भर देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाने सुरू केला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २४३ नगरपालिका आणि ४५ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या, तर शेवटच्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले. नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले. महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले, मात्र चंद्रपूरमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली. परभणीत उबाठाच्या मदतीने उपमहापौरपद मिळवण्यात आले.


१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी प्रभावी ठरली नाही. लातूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली, तरी सत्तेपासून दूर राहावे लागले. सांगली जिल्हा परिषदेतही अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले.



हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आव्हान:


मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात तोळामासा झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी व्यापक संघटनात्मक बदल अपरिहार्य आहेत. या पार्श्वभूमीवर ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्यासह जिल्हा कार्यकारिण्यांमध्ये फेरबदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या बदलांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

Iran - America War : “शांतता नाहीतर विनाश”; अमेरिकेची इराणला थेट युद्धाची चेतावणी, मध्यपूर्वेत तणाव वाढला

इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे.

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा