Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग; संघटनात्मक बदल करणार

राज्यभरातील ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली


मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग आली असून, संघटनात्मक पातळीवर व्यापक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये सन्मानजनक कामगिरी करण्यात अपयश आल्याने राज्यभरातील तब्बल ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते.


लोकसभा निवडणुकीत १४ जागा जिंकत काँग्रेसने राज्यात पुनरागमनाचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसला. परिणामी, संघटना बळकट करण्यावर भर देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाने सुरू केला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २४३ नगरपालिका आणि ४५ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या, तर शेवटच्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले. नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले. महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले, मात्र चंद्रपूरमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली. परभणीत उबाठाच्या मदतीने उपमहापौरपद मिळवण्यात आले.


१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी प्रभावी ठरली नाही. लातूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली, तरी सत्तेपासून दूर राहावे लागले. सांगली जिल्हा परिषदेतही अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले.



हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आव्हान:


मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात तोळामासा झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी व्यापक संघटनात्मक बदल अपरिहार्य आहेत. या पार्श्वभूमीवर ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्यासह जिल्हा कार्यकारिण्यांमध्ये फेरबदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या बदलांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

Comments
Add Comment

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक

Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व

Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या