Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग; संघटनात्मक बदल करणार

राज्यभरातील ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली


मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग आली असून, संघटनात्मक पातळीवर व्यापक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये सन्मानजनक कामगिरी करण्यात अपयश आल्याने राज्यभरातील तब्बल ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते.


लोकसभा निवडणुकीत १४ जागा जिंकत काँग्रेसने राज्यात पुनरागमनाचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसला. परिणामी, संघटना बळकट करण्यावर भर देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाने सुरू केला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २४३ नगरपालिका आणि ४५ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या, तर शेवटच्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले. नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले. महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले, मात्र चंद्रपूरमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली. परभणीत उबाठाच्या मदतीने उपमहापौरपद मिळवण्यात आले.


१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी प्रभावी ठरली नाही. लातूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली, तरी सत्तेपासून दूर राहावे लागले. सांगली जिल्हा परिषदेतही अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले.



हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आव्हान:


मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात तोळामासा झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी व्यापक संघटनात्मक बदल अपरिहार्य आहेत. या पार्श्वभूमीवर ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्यासह जिल्हा कार्यकारिण्यांमध्ये फेरबदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या बदलांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

Comments
Add Comment

Kashedi landslide: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम

उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दरड कोसळल्याचा फटका, धुळे–मुंबई एक्स्प्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द

Train cancellations : मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. कर्जत–लोणावळा आग्नेय घाट विभागात मुसळधार पावसामुळे दरड

Nashik Rain Update : पुढील 3 तास नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस, 60-70 वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता

Nashik Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. आजही नाशिकसह अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला

Pune Landslide : पुण्यातील मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळली; कुटुंब अडकल्याची भीती, NDRFचे बचावकार्य सुरू

पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. एका

Mumbai rain news : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला, सरकारी कार्यालये अर्धा दिवस सुरू राहणार

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन

Pune Mumbai Expressway : मुसळधार पावसाचा मोठा फटका; पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि जुना महामार्ग दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक