Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग; संघटनात्मक बदल करणार

राज्यभरातील ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली


मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग आली असून, संघटनात्मक पातळीवर व्यापक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये सन्मानजनक कामगिरी करण्यात अपयश आल्याने राज्यभरातील तब्बल ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते.


लोकसभा निवडणुकीत १४ जागा जिंकत काँग्रेसने राज्यात पुनरागमनाचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसला. परिणामी, संघटना बळकट करण्यावर भर देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाने सुरू केला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २४३ नगरपालिका आणि ४५ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या, तर शेवटच्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले. नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले. महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले, मात्र चंद्रपूरमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली. परभणीत उबाठाच्या मदतीने उपमहापौरपद मिळवण्यात आले.


१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी प्रभावी ठरली नाही. लातूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली, तरी सत्तेपासून दूर राहावे लागले. सांगली जिल्हा परिषदेतही अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले.



हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आव्हान:


मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात तोळामासा झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी व्यापक संघटनात्मक बदल अपरिहार्य आहेत. या पार्श्वभूमीवर ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्यासह जिल्हा कार्यकारिण्यांमध्ये फेरबदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या बदलांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

Comments
Add Comment

'फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले, उद्धव सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत दिली नव्हती'

मुंबई : अर्थसंकल्प आणि शेती यातील शून्य ज्ञान असलेले संजय राऊत शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत

Iran Israel War : इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी फेटाळून लावली अमेरिकेची बिनशर्त आत्मसमर्पणाची मागणी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या

दुबई विमानतळ बंद, विमानवाहतूक ठप्प

दुबई : अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध पश्चिम आशियात सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्याचे तळ ज्या

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.