NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे.


राज्यातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या १५४.६३५ किमी. आणि ३३२०.३८ कोटी रुपयांच्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. घोटी-त्र्यंबक-पालघर विभागात मार्ग विस्तार होणार आहे. केंद्राने मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या विस्तारामुळे राज्यातील औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यास मदत होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग विस्ताराला मिळालेल्या मंजुरीसाठी केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.


नाशिक आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी, औद्योगिक वाढ आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक