NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे.


राज्यातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या १५४.६३५ किमी. आणि ३३२०.३८ कोटी रुपयांच्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. घोटी-त्र्यंबक-पालघर विभागात मार्ग विस्तार होणार आहे. केंद्राने मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या विस्तारामुळे राज्यातील औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यास मदत होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग विस्ताराला मिळालेल्या मंजुरीसाठी केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.


नाशिक आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी, औद्योगिक वाढ आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : एसटीचा प्रवास महागला; १३.५६ टक्के भाडेवाढ; डिझेल दरवाढीसह वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस

Nitesh Rane : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजनच्या (SGIR) विकासाला गती; औद्योगिक व पर्यटन पायाभूत सुविधांवर भर

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सादरीकरण मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या

Chemical Tanker Explosion : चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक केमिकल टँकर फुटला, दुर्घटनेत एकाचा मृत्यू मुंबई : चेंबूर (Chembur) पूर्व येथील

Mumbai News : 'तो पायाचा तुकडा कोणाचा?',CSMT स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

सीएसएमटी स्थानकावर धक्कादायक प्रकार; एक्स्प्रेसमध्ये आढळला मानवी पायाचा तुकडा, पोलीस तपास सुरु मुंबई : छत्रपती

State Examinations : राज्यातील सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

'टीईटी' पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारचे पाऊल; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : राज्यात

Passive Euthanasia : इच्छामरणासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत समित्या स्थापन करणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही; खासगी रुग्णालयांचाही समावेश मुंबई : मागील काही वर्षांपासून