मुंबई : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे.
राज्यातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या १५४.६३५ किमी. आणि ३३२०.३८ कोटी रुपयांच्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. घोटी-त्र्यंबक-पालघर विभागात मार्ग विस्तार होणार आहे. केंद्राने मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या विस्तारामुळे राज्यातील औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग विस्ताराला मिळालेल्या मंजुरीसाठी केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
नाशिक आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी, औद्योगिक वाढ आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.







