विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना आपल्याला खिडकीच्या बाहेर पाहता येत, अनेक लोकांमुळे मनोरंजन होत असत. पण विमानाचा प्रवास हा कंटाळवाणा असतो. त्यामुळे अनेक जण जास्त करून संगीताचा किंवा चित्रपटाचा आधार घेतात. याच गोष्टींवर विमान वाहतूक मंत्रालयाने आता एक नवीन नियम जारी केला आहे . या नव्या नियमच उल्लंघन केल्यास थेट जेलची वारीही घडू शकते.


अनेक जण आपल्या मनोरंजनासाठी मोठ्या आवाजात गाणी लावतात, त्यामुळे इतर प्रवाश्यांसाठी ते गैरसोयीचे आणि त्रासदायक होते. याच प्रवाश्यांची दखल विमान वाहतूक विभागाने घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी असे मोठ्या आवाजात गाणी लावणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.


केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की बेशिस्त प्रवाशांना रोखण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने  ( DGCA ) जारी केलेल्या 'नागरी विमान वाहतूक आवश्यता' यानुसार ही कारवाई केली जाईल



विमान नियम १९३७ च्या अंतर्गत तरतुदी


नियम २२ : नियमानुसार, जर एखादा प्रवासी सुरक्षा किंवा शिस्तीचे उल्लंघन करत असेल, तर विमान कंपनी त्या प्रवाशाला विमानात प्रवेश नाकारू शकते किंवा विमानातून उतरवूही शकते


नियम २३ : हा नियम 'पायलट - इन - कमांड' यांना विशेष अधिकार देतो. विमानाची सुरक्षा किंवा शिस्त धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही प्रवाशांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार वैमानिकाकडे असतात.


नियम २९ : वरील नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाश्यांसाठी विशिष्ठ शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान