निवडणुकांनंतर अहिल्यानगरमध्ये गोळीबाराची घटना; एकाचा मृत्यू, रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती

अहिल्यानगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात दोन गटांतील वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.


माहितीनुसार, संध्याकाळच्या सुमारास घोडेश्वरी हॉस्पिटलमध्ये दोन गट आमनेसामने आले, आणि दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाले, वाद अधिक वाढल्यानंतर दोन्ही गटांकडून गोळीबार करण्यात आला . यात नितीन शिरसाट यांचा मृत्यू झाला. सुरज फुलमाळी यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिरसाट यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



रुग्णालय परिसरात गोंधळ


नितीन शिरसाट यांच्या मृत्यची बातमी समजताच दोन्ही गटांचे समर्थक घोडेश्वर रुग्णालय परिसरात जमा झाले. काही वेळ तणाव निर्माण होऊन धक्काबुक्की सुद्धा झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रांचा वापर, हल्ल्याचे नेमके कारण आणि यामागील तपास सुरू आहे.


घोडेगाव व आसपासच्या भागात यापूर्वीही गटांतर्गत संघर्षाच्या घटना घडल्याची नोंद आहे. नेवासा - श्रीरामपूर भागात वाळू तस्करी, अनेक अवैध धंदे गावठी कट्ट्या यामुळे या टोळ्यांमध्ये वारंवार गँगवॉर सुरु होता. काहीस राजकीय पाठबळ मिळत असलयाने कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर आव्हानात्मक आहे.

Comments
Add Comment

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर