राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


राहुल गांधींनी संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर केला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
हक्कभंग ऐवजी स्वतंत्र प्रस्ताव


राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करारात देश विकला, असा आरोप केला होता. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने त्यांच्याविरोधात मांडलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. सभागृहात निराधार विधाने करून लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’ मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.


याबाबत दुबे यांनी सांगितले की, राहुल गांधी देशाला दिशाभूल करत आहेत. या प्रस्तावात मागणी केली आहे की या प्रकरणावर चर्चा व्हावी, राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांना आयुष्यभर निवडणूक लढण्यावर प्रतिबंध लावावा. दुबे यांनी स्पष्ट केले की राहुल गांधींविरुद्ध कोणताही विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याचा त्यांचा मानस नाही. हा एक स्वतंत्र प्रस्ताव असून, गांधींचे संसदेतून निलंबन करण्याची मागणी त्यात केली आहे. राहुल गांधी जॉर्ज सोरोससारख्या बाह्य शक्तींच्या पाठिंब्याने देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.


दरम्यान, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही एखाद्या देशाकडून तेल खरेदी करू शकत नाही, असे अमेरिका सांगते त्यावेळी भारताची ऊर्जा सुरक्षा बाह्यशक्तीच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होतो.अमेरिकेने भारतावरील २५ टक्के टॅरिफ कमी केले, त्यावेळी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असे सांगितले. राहुल गांधी यांनी याचाच संदर्भ देऊन सभागृहात सरकारला धारेवर धरले होते.

Comments
Add Comment

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या