दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी) आतापर्यंत १५१ जागा जिंकल्या आहेत. यासह, पक्ष बहुमताच्या जवळ आहे आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा दिसत आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान यांनी ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही जागांवर जिंकले आहेत. त्यामुळे आता बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपीचं सरकार स्थापन होणार आहे.
बांगलादेशाच्या निवडणुकीत बीएनपीचा विजय झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
बांगलादेश निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपी नेते तारिक रहमान यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, हा विजय बांगलादेशच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो. भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. दोन्ही देश त्यांचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या सामायिक विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करतील अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.