Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं जबाबदार आहे आणि तिने करणी ( 'ब्लॅक मॅजिक') केली होती. या संशयावरून मुलीने आईची निर्घृण हत्या केली आहे. पुष्पावती असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या ३३ वर्षीय सुचित्रा नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.



ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट



सुचित्रा ही तुमकूर शहरात आपल्या पतीसोबत राहत होती. सुमारे १८ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवू न शकलेल्या सुचित्राने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. ज्योतिषाने सुचित्राला सांगितले की, तिच्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या आईने केलेल्या करणीमुळे झाला आहे. या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवून सुचित्राने आईच्या घरी जाऊन, ती गाढ झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली.



पोलीस घटनास्थळी पोहोचताच...



आईची हत्या केल्यानंतर सुचित्राने हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. परंतु पुष्पावती यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार थांबवले. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुचित्राची चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला.


याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सुचित्राच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येच्या कटात पतीचा सहभाग होता का, किंवा त्याला याबद्दल माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या ज्योतिषाने सुचित्राला प्रवृत्त केले, त्याचाही शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान