मुंबई महापालिकेतील सर्वांत मोठी प्रशासक राजवट आजपासून संपुष्टात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत मागील ०८ मार्च २०२२ पासून सुरु असलेली प्रशासक राजवट अखेर बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी होत असल्याने या पहिल्या सभागृहापासून प्रशासकाची नियुक्ती संपुष्टात येईल असे नमुद केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासक डॉ भूषण गगराणी हे आता प्रशासक ऐवजी आयुक्त म्हणूनच कार्यभार सांभाळणार आहेत . महापालिकेत प्रथमच ३ वर्षे ११ महिन्यांचा कालावधीत प्रशासक राजवट होती आणि महापालिकेतील ही सर्वांत मोठी प्रशासक राजवट महापालिकेच्या पहिल्या सभागृहानंतर संपुष्टात येणार आहे.


मुंबई महापालिकेत सन २०१७मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी हा ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे राज्यातील तत्कालिन ठाकरे सरकारने महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ . इक्बाल चहल यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर चहल यांची बदली झाल्यानंतर त्यांच्य जागील डॉ भूषण गगराणी यांची प्रशासक तथा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. नगरविकास खात्याच्यावतीने महापालिका प्रशासक पदी नियुक्ती करताना ही नियुक्ती महापालिकेच्या पहिल्या सभागृहापर्यंत सिमित असेल अशाप्रकारची अट घालण्यात आली होती. त्यानुसार आता प्रशासकाचा कालावधी पहिल्या सभागृहानंतर म्हणजे महापौर निवडीनंतर संपष्टात येत आहे.


मुंबई महापालिकेत एप्रिल १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीमध्ये प्रशासक नियुक्त होते. १३ महिन्यांच्या प्रशासक कालावधीमध्ये द.म.सुखटणकर आणि जे.जी.कांगा हे प्रशासक नियुक्त होते. त्यानंतर मुंबई महापालिकेत सन ८ मार्च २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये प्रशासक नियुक्त आहे. मागील तब्बल ३ वर्षे ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये हे प्रशासक नियुक्त असल्यामुळे महापालिकेचा कारभार त्यांच्याच हाती होता. महापौरांसह वैधानिक समिती तसेच विशेष समिती अध्यक्षांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती होता आणि प्रत्येक प्रस्तावाला प्रशासक हे मंजुरी देत असत. पण आता महापौर निवडीनंतर प्रशासकांचे हे सर्व अधिकार निघून जाणार असून सुमारे चार वर्षांनंतर नगरसेवकांच्या हाती महापालिकेचा कारभार येणार आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : भारत केवळ बाजारपेठ नाही तर जागतिक विकासाचे लॉन्चपॅड : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत हा केवळ मोठी बाजारपेठ नसून जागतिक विकासाचे "लॉन्चपॅड" बनल्याचे ठामपणे

Jalgaon : पोलिसांसमोरच राडा, पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचाही फुटल्या; प्रेम प्रकरणाचे नाट्यमय वळण

Jalgaon : पोलिसांसमोरच जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Stations) दोन गटांनी मारामारी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Railway Mega Block : रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेने (Central Railway) रविवारी, १२ जुलै रोजी मध्य (Central) आणि हार्बर (Harbour)

Koyana Dam : कोयना धरण ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर; १०० टक्के भरण्यासाठी अजून ५२.१२ टीएमसी पाण्याची प्रतीक्षा

कराड: पश्चिम घाटात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने कोयना धरणातील पाणी साठ्याच्या वाढीचा वेग मंदावला आहे. तरीही,

Kasara Ghat : कसारा घाटात पावसाचा कहर! संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाला तडे; वाहतूक एकेरी

शहापूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहापूर तालुक्यातील जुन्या कसारा घाटाला (Kasara Ghat)

UP firozabad Crime : आईने लग्नास नकार दिल्याचा संताप; १८ महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, अवघ्या ४० दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा

फिरोजाबाद : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील १८ महिन्यांच्या चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी