CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा आणि सुनेत्रा पवारांचा आगामी दिल्ली दौरा याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असल्याचे चित्र आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या बैठकीत खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या विलीनीकरणाबाबत भाजपची नेमकी भूमिका काय असेल, यावर या दौऱ्यात चर्चा झाली आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही स्थानिक नेत्यांनी दावा केला होता की लवकरच विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होऊ शकते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, केवळ 'निवडणूक समन्वय' साधण्याबाबत अजितदादांची भूमिका होती, असे स्पष्ट केले आहे. परंतु, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव पाहता विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.


सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा


नव्याने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार सुद्धा येत्या १२-१३ फेब्रुवारीला दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर आणि राज्यसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा