ICC T20 World Cup 2026 : भारत-पाक मॅच होणार? ICCने एका झटक्यात विषय संपवला अन्...

दुबई : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC T20 World Cup 2026) मधील सर्वात बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना अवघ्या सहा दिवसांवर असतानाच पाकिस्तानने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. भारतासोबत खेळण्यास सुरुवातीला नकार देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता आयसीसीसमोर ४ अटींची नवी खेळी खेळली आहे. रविवारी आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेऊ नये, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. मात्र, पाकिस्तानने आपली माघार मागे घेण्याऐवजी आयसीसीसमोर नव्या मागण्यांची यादीच सादर केली आहे. या मागण्यांवर आयसीसीने आता आपला अंतिम निर्णय दिला असून, भारत-पाक सामन्याच्या भवितव्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.



आयसीसीचा पाकिस्तानला दणका; ४ पैकी ३ मागण्या फेटाळल्या


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीसमोर मागण्यांची जंत्रीच सादर केली होती. यामध्ये त्यांची पहिली मागणी २०१२ पासून बंद असलेली भारत-पाक द्विपक्षीय मालिका तटस्थ ठिकाणी पुन्हा सुरू करण्याबाबत होती. मात्र, आयसीसीने हा विषय दोन देशांमधील बोर्डांचा असून तो आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली. दुसरीकडे, आयसीसीच्या एकूण महसुलात आपला वाटा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या बरोबरीने मिळावा, अशी पाकिस्तानची दुसरी आर्थिक मागणी होती; परंतु आयसीसीने त्यात कोणताही बदल करण्यास नकार दिला. सर्वात चर्चेत राहिलेली तिसरी मागणी म्हणजे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे (Handshake) धोरण थांबवावे, ही होती. बीसीसीआयचा हा निर्णय त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट करत आयसीसीने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. पाकिस्तानला दिलासा देणारी एकमेव गोष्ट म्हणजे त्यांची चौथी मागणी. २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमधून बांगलादेशला वगळून स्कॉटलँडला संधी दिल्यामुळे बांगलादेशला आर्थिक भरपाई मिळावी, ही मागणी मात्र आयसीसीने विचारात घेतली असून ती मान्य झाल्याचे समजते. अशा प्रकारे, चारपैकी तीन प्रमुख आघाड्यांवर पाकिस्तानला रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

Comments
Add Comment

GT vs RR : एका कॅचने फिरवला सामना; राजस्थानच्या हातून निसटली IPL फायनलची संधी!

मुंबई : आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) गुजरात टायटन्सने (GT) राजस्थान रॉयल्सचा (RR) ७ विकेट्स

IPL 2026 : क्वालिफायर-2 मध्ये टॉसवेळी गोंधळ, पुन्हा झाला टॉस, शुभमन गिल नाराज...

RR VS GT : आयपीएल २०२६ मध्ये आज क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीपूर्वी

IPL 2026 नंतर मोठा धक्का! ऋषभ पंतने सोडलं LSGचं कर्णधारपद; फ्रँचायझीचं अधिकृत वक्तव्य आले समोर

Mumbai : ऋषभ पंतने आयपीएल २०२६ मधील निराशाजनक हंगामानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

IPL Trade Bomb Hardik Pandya : हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार? शिवम दुबे-अयुष म्हात्रेच्या बदल्यात मोठ्या ट्रेडची चर्चा

मुंबई : आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामापूर्वी क्रिकेटविश्वात एका मोठ्या ट्रेडची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई

Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीबाबत मोठी अफवा! ३० कोटी आणि आलिशान फ्लॅटच्या चर्चांवर ललित मोदींचं स्पष्ट उत्तर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा युवा फलंदाज वैभव सुर्यवंशी पुन्हा

BCCI : IPL मध्ये आता स्मार्ट सनग्लासेसवरही बंदी! बीसीसीआयचा मोठा निर्णय; माहिती लीक होण्याची भीती

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयपीएल दरम्यान खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी स्मार्ट