उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या स्वीकारणार पदभार

मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार


मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.


सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, तसेच अल्पसंख्याक आणि औकाफ या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर दुपारी १२ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला त्या उपस्थित राहतील. अजित पवार यांच्या निधनामुळे या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली होती.


दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पददेखील सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पदभार स्वीकारण्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सुनेत्रा पवार मंत्रालयानजीकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातही हजेरी लावणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिला निर्णय कोणता घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया मुंबई :

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि

LIVE : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी सुरू, बघा कोण आघाडीवर ?

मुंबई : महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी

ICC T20 World Cup 2026 : भारत-पाक मॅच होणार? ICCने एका झटक्यात विषय संपवला अन्...

दुबई : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC T20 World Cup 2026) मधील सर्वात बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना अवघ्या सहा दिवसांवर

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

अजित पवारांच्या निधनामुळे भाजपने विजयाचा जल्लोष टाळला

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये