दिल्ली: गेल्या महिन्यात पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात आणण्यात आला. शनिवारी गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी मृतदेह पोहोचला तेव्हा त्याच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. दरम्यान पाकिस्तानी तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू कसा झाला, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
मच्छिमाराचा १६ जानेवारी रोजी झाला मृत्यू
जाफराबादचे मत्स्यव्यवसाय अधिकारी ओ.ए. मकरानी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील उना तालुक्यातील चिखली गावातील रहिवासी भागाभाई बांभनिया यांचे १६ जानेवारी रोजी कराची तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मकरानी म्हणाले की, त्यांचा मृतदेह वाघा सीमेवर (पंजाब) मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आला.
मच्छिमाराचा मृतदेह भारतात आणला
बंभनिया यांचे पार्थिव विमानाने अहमदाबादला नेण्यात आले आणि नंतर रस्त्याने त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांची बोट 'बुराक' चुकून आंतरराष्ट्रीय पाण्यात गेल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली.
भारतीय मच्छीमार बराच काळ पाकिस्तानी तुरुंगात
भारतीय मच्छिमाराची बोट 'बुराक' चुकून आंतरराष्ट्रीय पाण्यात गेल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. यानंतर त्याला पाकिस्तानी न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली. तथापि २०२२ मध्ये त्याची शिक्षा पूर्ण होऊनही तो बराच काळ तुरुंगात राहिला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरुंगात त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. दोन्ही सरकारांमधील बराच विलंब आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मच्छीमाराचा मृतदेह भारतात परत करण्यात आला.