Jalna Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने १६ जण रुग्णालयात, जालन्यात नेमकं घडलं काय?

जालना: जालन्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल १५ ते १६ जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यात लहान मुलांचाही समावेश असून सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात ही घटना घडली आहे


जालन्यात फूड पॉइझनिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत लहान मुलांचाही समावेश असून सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात ही घटना घडली आहे.


नेमकं घडलं काय?



टट्टूपुरा भागात एका फेरीवाल्याने पाणीपुरी विक्रीसाठी गाडा लावला होता. परिसरातील लहान मुलांसह काही नागरिकांनी या गाड्यावर पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे अनेकांना अशक्तपणा जाणवू लागला. त्रास वाढत गेल्याने रात्री उशिरा बाधित नागरिकांना शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


प्राथमिक तपासणीत पाणीपुरी खाल्ल्यामुळेच फूड पॉइझनिंग झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात असून महापालिका प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील फेरीवाल्यांची तातडीने तपासणी करावी, तसेच दोषी फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा