पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहेत. या परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. त्यांनी यावर्षी परीक्षेसाठी नवीन नियमावली केली असून ते नियम पळाले नही तर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नवीन नियमांनुसार; परीक्षा केंद्राच्या परिसरात १०० मीटर अंतरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच एका विद्यार्थी सोबत दोन किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर, ई-मेल सेंटर, इंटरनेट सुविधा, आणि कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या १०० मीटरच्या अंतरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप यांसारखी साधने जवळ बाळगणे किंवा वापरण्यावर पूर्णपणे मनाई आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.