Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहेत. या परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. त्यांनी यावर्षी परीक्षेसाठी नवीन नियमावली केली असून ते नियम पळाले नही तर कडक कारवाई करण्यात येणार आहे.


नवीन नियमांनुसार; परीक्षा केंद्राच्या परिसरात १०० मीटर अंतरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच एका विद्यार्थी सोबत दोन किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर, ई-मेल सेंटर, इंटरनेट सुविधा, आणि कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या १०० मीटरच्या अंतरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप यांसारखी साधने जवळ बाळगणे किंवा वापरण्यावर पूर्णपणे मनाई आहे.


या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना