Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी 'गमोसा' देऊन स्वागत केले.


पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.


परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील १० वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची निवड झाली. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव झाल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.



काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा २०२६' साठी देशभरातील तब्बल ४.५ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेतून देशभरातून केवळ ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथील १० वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची झालेली निवड आपल्या प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून टाकणारी आहे.





ग्रामीण भागातील शाळेत शिकणारा आपला मुलगा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार... ही संधी केवळ प्रणवसाठीच विशेष नाही, तर यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळणार आहे. प्रणवसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.


प्रणवचे व त्याला घडवणाऱ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि त्याच्या विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!

Comments
Add Comment

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती