Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी 'गमोसा' देऊन स्वागत केले.


पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.


यावेळी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध भेटवस्तू दिल्या. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे रेखाचित्र, स्वतः मुलांनी बनवलेले पुष्पगुच्छ आणि त्रिपुरातील नारळाच्या लाकडापासून बनवलेली सतार, सेंद्रिय चहा (यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की ते चहा विक्रेत्याला चहा देत आहेत) आणि आसाममधील गमछा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.





अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची:


परीक्षा पे चर्चा २०२६ या पर्वातून अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची आहे यावर भर दिला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ५ कानमंत्र दिले आहेत. तसेच परीक्षेला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा. पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही परीक्षेत तुमची सर्वोत्तम कामगिरी साध्य करू शकता.



पंतप्रधान मोदींनी दिले विद्यार्थ्यांना हे ५ कानमंत्र


- परीक्षांना उत्सवासारखे मान द्या.



- इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा.



- तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे वापर करा.



- कठीण कामांना प्रथम सामोरे जा.



- पोपट नाही तर परीक्षा योद्धा बना.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर