Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात राज्यातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असून, विधानसभेतील नव्या संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड झाले आहे. भाजपचे सर्वाधिक १३७ आमदार निवडून आल्याने भाजपच्या वाट्याला ४ जागा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या ३ जागा आता महायुतीच्या खात्यात जाण्याची चिन्हे आहेत. मविआतील प्रमुख पक्षांचे संख्याबळ कमी झाल्याने त्यांना ७ पैकी केवळ १ जागेवर समाधान मानावे लागू शकते. विशेष म्हणजे, कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश असल्याने, त्यांच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागते किंवा मविआ आपली एकमेव जागा कोणाला देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेसाठी आवश्यक असलेला ३७.५ मतांचा कोटा पूर्ण करणे हे विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.



शरद पवारांसह कोणाकोणाचा समावेश ?


राज्यातील एकूण १९ जागांपैकी ७ जागांचा कार्यकाळ येत्या २ एप्रिल रोजी संपणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान या निवृत्त होत आहेत. ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचाही कार्यकाळ याच दिवशी पूर्ण होणार असून, काँग्रेसच्या रजनी पाटील यांचीही मुदत संपत आहे. दुसरीकडे, महायुतीमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांचीही खासदारकी २ एप्रिल रोजी संपणार आहे. विधानसभा निवडणुकीतील बदललेल्या संख्याबळामुळे या रिक्त होणाऱ्या जागांवर आता कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्याच्या गणितानुसार, महायुतीला यातील बहुतांश जागांवर विजय मिळवणे सोपे असले तरी मविआ आपली एकमेव जागा राखण्यासाठी कोणाला रिंगणात उतरवते, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी