Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचार सुरु आहे. यातच लोकांचा प्रतिसाद महायुतीला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंभर टक्के निकाल लागेल. तसेच जिल्ह्यात शंभर टक्के महायुतीचा विजय होईल असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.


 

'सिंधुदुर्गचा निकाल महाराष्ट्रात एक नंबरचा असेल'


मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले, "लोकांचा प्रतिसाद महायुतीला आहे. जिल्हा परिषदेचे 50 आणि पंचायत समिती 100 असे सगळे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंभर टक्के निकाल लागेल. येणाऱ्या 9 तारखेला सिंधुदुर्गचा निकाल महाराष्ट्रात एक नंबरचा असेल.


पुढे बोलताना, सभांना अतिशय पोषक वातावरण आहे, महायुतीचे सर्व उमेदवार सक्षमपणे लोकांसमोर जात आहेत, मात्र विरोधी उमेदवार शेंबड्यासारखे रडण्यापलीकडे काही करत नाहीत अशी टीका पक्षावर राणेंनी केली आहे. आमच्यावर टीका कोणत्या पद्धतीने करावी हे त्यांना माहित नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास नाही आणि त्यांच्याकडे निवडून देण्याचं स्पष्ट कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.


 

'सिंधुदुर्गची जनता महायुतीसोबत'


पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "निवडणुका आहेत, त्यामुळे थोड्या कुरघोड्या झाल्या नाहीत तर मजा नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन जे अतृप्त आत्मे आहोत, त्यांच्याशी बोलत आहोत. शेवटी ते आमचेच कार्यकर्ते आहेत. कोणीही कितीही वातावरण खराब केलं तरी सिंधुदुर्गची जनता महायुतीसोबत आहे. जनता आम्हालाच आशीर्वाद देईल."


 

'आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत आहोत'


पुढे बोलताना, आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत आहोत. सत्तेत असताना विरोधकांनी सिंधुदुर्गसाठी काय दिले, हे प्रश्न जनता विचारणार आहे. ते तोंड लपवत सगळीकडे फिरत आहेत. विरोधकांचा एकही राजकीय नेता सिंधुदुर्गात फिरकला नाही. ते मानसिक पद्धतीने युद्ध हरलेले आहेत. एकतर्फी विजय आमच्या महायुतीचा होत असताना दिसेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.


मंत्री नितेश राणे यांनी म्हटले की, "मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझ्या कारकिर्दीत सिंधुदुर्गचं वातावरण मी खराब होऊ देणार नाही. महायुतीच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला दहा तारखेला माझ्यासोबत चहा पिण्यासाठी अपॉइंटमेंट देईन; हे त्यांनी लक्षात ठेवावे. आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. आम्हीच उद्या निधी देऊ शकतो. सगळ्या बाजूने सक्षम असल्याने उर्वरित जागा सुद्धा आम्ही जिंकू."


Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या