Nitesh Rane : 'हिरव्या सापांना ठेवण्याची गरज, महाराष्ट्र जिहादमुक्त करणारच!'; नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'वरून मंत्री नितेश राणे आक्रमक

पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी 'देवभाऊ' सोडणार नाहीत...


मुंबई : "आमच्यावर हिंदू-मुस्लिम केल्याची टीका करणाऱ्यांनी नाशिकचा 'कॉर्पोरेट जिहाद' डोळे उघडून पाहावा. या देशाला इस्लामी राष्ट्र बनवण्याचं 'गजवा-ए-हिंद'चं षड्यंत्र रचलं जात आहे, पण लक्षात ठेवा, हे जिहादी तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी आमचे 'देवभाऊ' (देवेंद्र फडणवीस) यांना सोडणार नाहीत," अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी जिहादी प्रवृत्तींना ललकारले आहे. नाशिकमधील खळबळजनक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणावर राणे यांनी आज आक्रमक पत्रकार परिषद घेतली.


?si=yHJuRaJWLrgAyExW

'कॉर्पोरेट जिहाद'चा पर्दाफाश


नितेश राणे म्हणाले की, नाशिकमध्ये जे घडलं तो निव्वळ गुन्हा नसून तो एक 'कॉर्पोरेट जिहाद' आहे. "आम्ही धर्मात भांडणं लावतो असं म्हणणाऱ्यांना नाशिकच्या घटनेने चोख उत्तर दिलंय. आमच्या १५ हिंदू भगिनींनी आतापर्यंत तक्रारी दिल्या आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिक पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी या जिहाद्यांना गजाआड करून आमच्या बहिणींना न्याय मिळवून दिला.



६०० जणांची गर्दी अन् याकूब मेमनची आठवण


जिहाद्यांना कोर्टात हजर केलं असता त्यांच्या समर्थनासाठी जमलेल्या ६०० जणांच्या गर्दीवर राणे यांनी संताप व्यक्त केला. "या आरोपींच्या समर्थनासाठी ६०० लोक जमा होतात, ही गर्दी पाहून याकूब मेमनच्या अंत्ययात्रेची आठवण येते. मग यात तुमचा 'सर्वधर्म समभाव' कुठे गेला? मशिदीतून आलेले हे ६०० लोक कोण होते, त्यांना कोणत्या मौलवींनी सांगितलं, यावर आमचा पूर्ण 'वॉच' आहे," असा इशाराही त्यांनी दिला.



संबंधित कंपनीच्या 'HR' वरही गुन्हा दाखल करा!


नितेश राणे यांनी केवळ गुन्हेगारांवरच नाही, तर कंपनीच्या व्यवस्थापनावरही तोफ डागली. "माझी मागणी आहे की, संबंधित कंपनीच्या HR वरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या कार्यालयात धर्मांतर आणि हिंदू मुलींचे लैंगिक शोषण सुरू असताना तुम्ही गप्प का होता? तुम्ही या प्रकाराला प्रोत्साहन दिलं का? याची चौकशी झालीच पाहिजे," अशी मागणी राणेंनी केली.



"आता कुठे लपलात?"


नेहमीच हिंदूंच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या नेत्यांना राणेंनी सुनावलं, "आता कुठे गेले अबू आझमी, जितेंद्र आव्हाड आणि एमआयएमवाले? आता तुमची भूमिका स्पष्ट करा, तुमच्यात हिम्मत असेल तर या घटनेचा निषेध करून दाखवा," असं ओपन चॅलेंज राणेंनी दिलं.



एकच अजेंडा...जिहादमुक्त महाराष्ट्र'


मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील हिंदू समाजाला एक आर्थिक हिता'चे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. ते अत्यंत आक्रमकपणे म्हणाले की, "आम्ही जेव्हा 'हिंदूंकडूनच खरेदी करा' आणि 'व्यवहार केवळ हिंदूंसोबतच करा' अशी भूमिका घेतो, तेव्हा आमच्यावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो. परंतु, या भूमिकेमागे एक अत्यंत ठोस आणि गंभीर कारण आहे. आज देशात आणि महाराष्ट्रात 'गजवा-ए-हिंद' नावाचं एक अघोरी षड्यंत्र अत्यंत पद्धतशीरपणे राबवलं जात आहे. तुमच्याकडून मिळणारा पैसा हा पुन्हा तुमच्याच धर्माविरुद्ध, तुमच्याच बहिणींच्या शोषणासाठी वापरला जात असेल, तर आपण का सावध होऊ नये?" नितेश राणे यांनी पुढे स्पष्ट केले की, हे केवळ व्यावसायिक आवाहन नसून तो अस्तित्वाचा लढा आहे. "नाशिकसारख्या शहरात जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात शिरून हिंदू मुलींचे शोषण केले जाते, तेव्हा लक्षात येते की हे लोक किती खोलवर घुसले आहेत. हे लोक म्हणजे समाजात वावरणारे 'हिरवे साप' आहेत आणि त्यांना वेळीच ठेचणे ही काळाची गरज आहे. जर आपण त्यांना आर्थिक रसद पुरवणे बंद केले, तरच त्यांचे हे मनसुबे उधळून लावले जातील." शेवटी ते म्हणाले, "आमचा आता एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे 'जिहादमुक्त महाराष्ट्र'. महाराष्ट्राची माती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, इथे कोणत्याही प्रकारचा जिहाद खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत या राज्यातील प्रत्येक कोपरा जिहादमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा आणि ही जनजागृती थांबणार नाही."

Comments
Add Comment

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

Shevgaon News : कोट्यवधी खर्चूनही १० वर्षांपासून रखडला शेवगावचा सांडपाणी प्रकल्प; गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

शेवगाव : नगरपरिषदेमार्फत सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी

Agriculture News : ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून किमान आधारभूत किमतीअंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१

Weather Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट': पुढचे १० तास देशासाठी धोक्याचे! जाणून घ्या महाराष्ट्राचा अंदाज काय ?

देशातील हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) अत्यंत धोक्याचा इशारा दिला आहे.

Sangali Tadkadtai : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा वारसा; कोकणचा ‘संकासूर’ आणि सांगलीची ‘तडकडताई’

महाराष्ट्र: महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. येथे केवळ सण-उत्सव साजरे केले जात नाहीत, तर शतकानुशतके चालत

Pune News : मदरसा क्लासच्या बहाण्याने घरी थांबवलं आणि १४ वर्षाच्या मुलीला नको नको तिथे... पुण्यातील कात्रज हादरले!

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असतानाच, आता