Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील घडामोडींनंतर संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत दाखल झालं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार सकाळीच बारामतीत दाखल पोहोचले आहेत. पवार यांच्या सहयोग निवास्थानी संपूर्ण पवार सांत्वन भेटीसाठी हजर राहणार आहे. यावेळी अजित पवार यांनी साधलेला शेवटचा संवाद ऐकवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


अजित पवार यांच्या बारामतीत सहयोग या निवास्थानी मागील ३ दिवसांपासून पवार कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली जात आहे. आज बुधवारी सकाळी ८ वाजता बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद काय होता, हे सर्वांना ऐकण्यात येणार आहे, अशी माहिती पवार कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, बुधवारी संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य भेटण्यासाठी हजर राहणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दोन्ही मुलं जय आणि पार्थ पवार हजर असणार आहेत. तसेच पवार कुटुंबातील सदस्यही हजर राहतील. यावेळी मोठ्या संख्येने बारामतीकर पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार आहेत. पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येणार आहेत. यावेळी शरद पवार देखील अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांची सहयोग बंगल्यावर जाऊन शरद पवार सगळ्यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


तसेच अजित पवार यांचा 'दशक्रिया विधी' होणार नाही, असं त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले असल्याने, आता यापुढे कोणताही वेगळा विधी केला जाणार नसल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. ६ फेब्रुवारी रोजी त्यांचा दहावा दिवस (दशक्रिया विधी) आहे. मात्र, श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता १० व्या किंवा १३ व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही.


स्वर्गीय अजित पवारांच्या अस्थींची देशव्यापी कलश यात्रा


दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी भव्य आणि देशव्यापी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कलश यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशभर फिरत, पवित्र नद्या आणि प्रमुख धार्मिक स्थळांवर अस्थी-कलश विसर्जन करून पूर्ण होणार आहे. या कलश यात्रेअंतर्गत उत्तराखंडमधील हरिद्वार येथील हर की पौडी, उत्तर प्रदेशातील तीर्थराज प्रयागराजचा पवित्र संगम, तसंच वाराणसी येथील मणिकर्णिका घाट यांसह देशातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांवरील पवित्र नद्यांमध्ये अस्थी-कलश विसर्जन करण्यात येणार आहे. याशिवाय बिहारमधील गयाजी, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, काश्मीर आदी अनेक राज्यांमध्येही श्रद्धांजली स्वरूपात कलश विसर्जनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ही देशव्यापी कलश यात्रा देशाच्या चारही दिशांकडे (उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम) प्रवास करणार असून ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. या कालावधीत ही यात्रा १४ पेक्षा अधिक राज्यांतून जाणार आहे. यात्रेची विधिवत सुरुवात देवभूमी हरिद्वार येथील हर की पौडी आणि तीर्थराज प्रयागराज येथील संगमातून करण्यात येणार आहे. या देशव्यापी कलश यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा करणार आहेत.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी