उबाठाच्या खासदाराने EVM चे कौतुक केले, ठाकरेंना तोंडावर पाडले

धाराशिव : EVM मध्ये गडबड असल्याचा आरोप करायचा पण निवडणूक आयोगाने पुरावा मागताच गप्प बसायचे या पद्धतीने मागील काही काळापासून विरोधक वागत आहेत. पण आता विरोधकांचीच कोंडी झाली आहे. उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएमची पाठराखण केली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर कौतुक केले. या घडामोडींमुळे ईव्हीएम विरोधात बोलणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची अवस्था तोंडावर पडल्यासारखी झाली आहे.


ढोकी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप फेटाळले. जर ईव्हीएममध्ये खरोखर घोळ असता तर मी खासदार झालो असतो का? मोदींसाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची होती. मग तिथे घोळ करून मला पाडले नसते का? मी खासदार झालो याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा नाही; असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी ५० मते तपासणे, ७C फॉर्मवरील सिरीयल नंबर नोंदवणे आणि मतमोजणीवेळी तीच मशीन आहे का? याची खात्री करणे. या तीन गोष्टी केल्या, तर ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही; असे खासदार ओमराजे निंबाळकर ठामपणे म्हणाले.


ओमराजेंच्या वक्तव्याचा आधार घेत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उबाठाला ईव्हीएमच्या मुद्यावर घेरले. ओमराजेंनी सत्य स्वीकारले आहे. आता दररोज सकाळी भोंगा वाजवणाऱ्या संजय राऊतांना सांगा की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही. तुम्ही स्वतःच्या खासदाराचे तरी ऐका. निवडून आले की ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएममध्ये घोटाळा, अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधीच घेतली नाही. भाजप आणि शिवसेनेने गडबड केल्याचा आरोप करणे हा प्रकार आता थांबवा; असे प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत दिले. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

मुलांच्या डिजिटल व्यसनाबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त; माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती

पुढील अधिवेशनाच्या आत याबाबत अहवाल दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करणार मुंबई : मुलांमध्ये वाढत

Legislative Council Election 2026 : कोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला लॉटरी लागणार ? विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त!

मुंबई : येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी उडणार आहे. सध्याचे संख्याबळ

'रो-रो'च्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आणि राज्ये मुंबईशी जोडणार - मंत्री नितेश राणे यांची माहिती

जलमार्गांचे जाळे उभारण्याची मुख्यमंत्र्यांची संकल्पना सत्यात उतरवणार मुंबई : "शिमग्याच्या निमित्ताने कोकणात

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

Epstein Files : एपस्टाईन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर 'या' देशाच्या पंतप्रधानांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एपस्टाईन फाइल्समुळे गोंधळ उडाला आहे. अशातच या फाइल्समध्ये नाव आलेल्या एका

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील