उबाठाच्या खासदाराने EVM चे कौतुक केले, ठाकरेंना तोंडावर पाडले

धाराशिव : EVM मध्ये गडबड असल्याचा आरोप करायचा पण निवडणूक आयोगाने पुरावा मागताच गप्प बसायचे या पद्धतीने मागील काही काळापासून विरोधक वागत आहेत. पण आता विरोधकांचीच कोंडी झाली आहे. उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएमची पाठराखण केली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर कौतुक केले. या घडामोडींमुळे ईव्हीएम विरोधात बोलणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची अवस्था तोंडावर पडल्यासारखी झाली आहे.


ढोकी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप फेटाळले. जर ईव्हीएममध्ये खरोखर घोळ असता तर मी खासदार झालो असतो का? मोदींसाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची होती. मग तिथे घोळ करून मला पाडले नसते का? मी खासदार झालो याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा नाही; असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी ५० मते तपासणे, ७C फॉर्मवरील सिरीयल नंबर नोंदवणे आणि मतमोजणीवेळी तीच मशीन आहे का? याची खात्री करणे. या तीन गोष्टी केल्या, तर ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही; असे खासदार ओमराजे निंबाळकर ठामपणे म्हणाले.


ओमराजेंच्या वक्तव्याचा आधार घेत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उबाठाला ईव्हीएमच्या मुद्यावर घेरले. ओमराजेंनी सत्य स्वीकारले आहे. आता दररोज सकाळी भोंगा वाजवणाऱ्या संजय राऊतांना सांगा की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही. तुम्ही स्वतःच्या खासदाराचे तरी ऐका. निवडून आले की ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएममध्ये घोटाळा, अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधीच घेतली नाही. भाजप आणि शिवसेनेने गडबड केल्याचा आरोप करणे हा प्रकार आता थांबवा; असे प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत दिले. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज