राऊत हे उबाठाचे प्रवक्ते आहेत की पवार, काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे ?

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा परखड सवाल


मुंबई : संजय राऊत हे अधिकृतपणे उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून भाजपावर उठसूठ बिनबुडाची टीका करत असतात. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांमुळे ते शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत की काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे प्रवक्ते आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.या प्रश्नाचे उत्तर राऊतांनी द्यावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवारांचे दलाल आणि मुखिया म्हणून राऊतांची नियुक्ती झाली आहे का असा सवालही श्री. बन यांनी केला.


राऊत उबाठा गटाचे खासदार, प्रवक्ते म्हणून मिरवतात. मात्र प्रत्यक्षात ते राजकीय भूमिका शरद पवारांच्या हिताची घेतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. उबाठा गटाचे प्रवक्ते असताना प्रत्येक पक्षाच्या कारभारात नाक खुपसायचे काम राऊतांनी तात्काळ बंद करावे असे स्पष्ट शब्दांत सुनावून श्री. बन म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे बघण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. अजितदादा यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल महाराष्ट्राला पटेल अशी समतोल भूमिका घेत आहेत. राऊतांचे दोन पाय शरद पवार राष्ट्रवादीमध्ये, हात काँग्रेसमध्ये आहेत अशा स्थितीत उबाठा गटामध्ये राऊतांचे डोके तरी आहे का ?, की डाव्या आघाडीकडे डोके गहाण ठेवले आहे असा बोचरा सवाल श्री. बन यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संगमा, तारीक अन्वर, अरुण गुजराती यांनी पक्षहितासाठी प्रामाणिकपणे काम केले. आज अचानक ‘पटेल’ या नावावर आक्षेप घेत राऊत राजकारण करत आहेत.


राष्ट्रवादीचा ताबा घेण्यासाठी टपून बसलेल्या डोम कावळ्यांपासून पक्षाने सावध रहावे


अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी काही डोमकावळे टपून बसले आहेत. त्या डोम कावळ्यांपैकी एक राऊत आहेत. अशा डोम कावळ्यांपासून राष्ट्रवादी पक्षाने सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, दोन्ही कुटुंबे एकत्र येणार असतील, तर भाजपाचा त्याला विरोध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करायचे की नाही, हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. त्या जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असेल. परंतु त्याआधी अजितदादांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमके मत काय होते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे की अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नव्हती.


महाराष्ट्रातील जनतेने उबाठा गटाला महापालिका निवडणुकीत खरी जागा दाखवून दिली आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये उबाठा गटाला एकही जागा मिळालेली नसून, पक्षाचे संघटन देखील अस्तित्वात राहिलेले नाही. तसेच कर्जत-जामखेडमध्ये जनतेने रोहित पवारांना नाकारले होते. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर केला नसता, तर त्यांचा पराभव निश्चित होता, असा आरोपही श्री. बन यांनी केला.


भारत – अमेरिका व्यापार करार हा नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा विजय आहे.


भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नेतृत्व सक्षम आणि दूरदृष्टीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज जगभरात भारताचा सन्मान वाढत असून, अमेरिकेसारखा सामर्थ्यशाली देश पुन्हा एकदा भारतासोबत आला आहे. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा तो विजय आहे. मात्र राऊत जाणीवपूर्वक राहुल गांधींची भाषा वापरत जागतिक पातळीवर भारताचा आणि देशाच्या नेतृत्वाचा अपमान करून देशाच्या प्रतिमेला धक्का देण्याचे काम करत आहेत, असा आरोप श्री. बन यांनी केला. देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करत नाही हे राऊतांनी लक्षात ठेवावे असेही श्री. बन यांनी नमूद केले.


Comments
Add Comment

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध

BMC News : कोविड काळातील ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा गेली कुठे? , स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनाचा सवाल

माहिती सादर करण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई : कोविड काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी

Malaria and Dengue : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान, मलेरिया ३,६८१, डेंग्यू ९३८, लप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद!

एडिस व अनोफिलीस डासांच्या २७ हजारांहून अधिक आळ्या सापडल्या ३६ लाख ८१ हजार लोकांचा सर्वे, १० लाखांहून अधिक

Mumbai Illegal Debris : अनधिकृत डेब्रीजबाबत दिल्ली पॅटर्न, इमारत बांधकामाचे डेब्रीज आता थेट सी अँड प्रकल्पातच जाणार

अनधिकृत डेब्रीज वाहणाऱ्या डंपरवर होणार कारवाई स्थायी समितीत प्रस्तावाला दिली मंजुरी मुंबई : मुंबई (Mumbai) शहरात

Tree Plantation : प्रकल्पात बाधित होणारी झाडे आता लावणार मुंबईतच

पर्यायी वृक्षारोपण आणि पुनर्रोपण मुंबईतच करण्याचे स्थायी समितीचे प्रशासनाला निर्देश नगरसेवकांना जागा

Juhu Beach : जुहू चौपाटीवर मागील दहा दिवसात तब्बल १ हजार ८०० मेट्रिक टन केला गोळा.

मुंबई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि त्यामुळे समुद्रात वाहून गेलेला तसेच भरतीच्या लाटांमुळे पुन्हा किनाऱ्यावर