शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला

मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेली


मुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला असून हे काम सध्या रखडलेले आहे. परंतु, या मंडईतील परवानाधारक कोळी भगिनींना अर्धवट काम राहिलेल्या मंडईतील तळघरातील वास्तूत पुन्हा जागा उपलब्ध करून दिली आहे. पण यामध्ये निम्म्या कोळी भगिनींचा बाजारच उठवला गेला आहे. विशेष म्हणजे या मंडईत मागील पाच वर्षांपासून या कोळी भगिनींचे पुनर्वसन केले असले तरी याठिकाणी पिण्यासह इतर पाण्याची तसेच गटार तुंबून अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे . त्यामुळे आधीच निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला आता ज्या व्यवसाय करतात त्यांच्या समस्येकडेही बाजार विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने कोळी भगिनींनी याठिकाणी व्यवसाय करायचा कसा असा सवाल केला जात आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने परेल येथील शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मंडईच्या जागी मासळी बाजारसह मार्केट आणि कामगार वसाहत अशाप्रकारे बांधकाम हाती घेतले आहे.. परंतु, या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून चार मजल्यांचे बांधकाम झाल्यानंतर विकासकाने अर्धवट सोडून दिल्यानंतर जिथे कोळी बांधवांना मागील बाजुस दिलेल्या पर्यायी जागेतून हलवून या अर्धवट वास्तूमध्ये आणले गेले. परंतु याठिकाणी परवानाधारक सर्वच कोळी भगिनींची जागा उपलब्ध नसल्याने अर्ध्याच कोळी भगिनींना याठिकाणी बसता येते. परिणामी निम्म्या कोळी भगिनींना मार्केटमध्ये बसण्याचीच जागा सल्याने त्याठिकाणी केवळ ५० कोळी भगिनींनाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


या मार्केटमधील कोळी भगिनींच्या म्हणण्यानुसार, पाच वर्षांपूर्वी पर्यायी जागेवरुन हटवून अर्धवट काम झालेल्या मंडईतील तळघरात अर्थात बेसमेंटमध्ये जागा दिली. तीसुध्दा निम्म्याच कोळणींना बसण्याची जागा दिली. या मार्केटमध्ये एकूण ११४ परवानाधारक कोळी भगिनी होत्या. पण आता त्यात बसण्याची जागा नसल्याने आणि काही कोळी भगिनी येत नाहीतर काहींना वयोमानानुसार बेसमेंटमध्ये टोपल्या घेवून जाणे शक्य नसल्याने त्यांनी येणे टाळले.


विशेष म्हणजे या मार्केटमध्ये सुरुवातील सीसी टिव्हीपासून सर्व सुविधा दिल्या होत्या, पण आता तिथे माशांकरता तसेच स्वच्छतागृहांसाठी पाण्याची सुविधा नाही. जर माशांवर शिंपडण्यासाठी पाणीच नसेल तर मासे कसे टिकणार असा सवाल करत कोळी भगिनींनी तेथील टॉयलेटसाठी पाणी नसल्याचीही खंत व्यक्त केली . तसेच ही जागा बेसमेंटमध्ये असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही, परिणामी मासे खरेदी करणाऱ्यांना या सांडपाण्यात उभे राहावे लागते,तसेच यामुळे उंदिर तसेच घुशींचा त्रासही सहन करावा लागतो. महापालिकेच्या मार्केट विभागाचा अधिकारी कधीही या मार्केटमध्ये येत नाही की कोळी भगिनींच्या तक्रारींची दखल घेत नाही. त्यामुळे नक्की मासळी बाजार हे कोळी भगिनींना व्यवसाय करण्यासाठी आहेत की त्यांचा बाजार उठवण्यासाठी आहे असा सवाल कोळी भगिनींकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया