मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू घेऊन जात असलेला टँकर उलटला. टँकरमधून वायू गळती सुरू झाली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काही तासांसाठी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. काही काळानंतर एका बाजूने वाहतूक सुरू झाली. पण तोपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी ३० तासांपेक्षा जास्त काळ झाला तरी सुटलेली नाही. कोंडी सुटण्याआधीच पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पेट्रोलने भरलेल्या टँकरला अपघात झाला. या अपघातामुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.


बुधवारी रात्रीच्या सुमारास टोनी धाब्याजवळ पेट्रोलचा टँकर आणि एका भरधाव कंटेनर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, पेट्रोलचा टँकर हा महामार्गावरून खाली उतरला. या अपघातात दोन्ही पेट्रोलच्या टँकरचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर कंटेनरच्या केबिनचंही मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. अपघातग्रस्त पेट्रोलचा टँकर आणि कंटेनर हटवण्याचं काम सुरू आहे.


आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या टँकरमधील प्रोपिलीन वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम पण सुरू आहे. पण दोन अपघातांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा, पोलीस आणि महामार्ग प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सुरक्षिततेचा पूर्ण आढावा घेतल्यानंतरच महामार्ग पूर्णपणे खुला केला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तोपर्यंत प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)


माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त) कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध