Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून २ सख्ख्या भाऊ-बहि‍णीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे घडली आहे. श्रवण संतोषकुमार अंकलगी (वय १५) व श्रावणी संतोषकुमार अंकलगी (१०), असं मृत्यू झालेल्या बहीण-भावाचं नाव आहे.


मृत्यू झालेल्या बहीण-भावाचे वडिल संतोषकुमार अंकलगी यांचं काही वर्षापूर्वी अपघातात निधन झालं. त्यानंतर आई उषा संतोषकुमार अंकलगी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहत होते.


नेमकं काय घडलं ?


रविवारी म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. मुलगा श्रवण हा शाळेला सुट्टी असल्यानं विंचूरवरून घरी कारकलला आला होता. दुपारी दीडच्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी शेततळ्यात पोहण्यासाठी गेले यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावं, यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधली होती. मात्र, दुर्दैवानं झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण, त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी कोणीच नव्हते.


नात,नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळ झाले तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नसल्यानं आजी महादेवी कोळी शेततळ्याकडे गेल्या असता श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले. आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढलं.


दोन्ही चिमुकले बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारासाठी मंद्रप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं . याचा अधिक तपास पोलिस हवालदार विठ्ठल बिराजदार हे करीत आहेत.


या घटनेमुळे अंकलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपूर्वीच या मुलांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. वडील नसल्यामुळे आई आणि आजीने मोठ्या कष्टाने या दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र, काळाने घाला घातल्यानं दोन्ही मुले एकाच वेळी हिरावली गेली. या घटनेमुळे औज मंद्रूपसह संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा