Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून २ सख्ख्या भाऊ-बहि‍णीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे घडली आहे. श्रवण संतोषकुमार अंकलगी (वय १५) व श्रावणी संतोषकुमार अंकलगी (१०), असं मृत्यू झालेल्या बहीण-भावाचं नाव आहे.


मृत्यू झालेल्या बहीण-भावाचे वडिल संतोषकुमार अंकलगी यांचं काही वर्षापूर्वी अपघातात निधन झालं. त्यानंतर आई उषा संतोषकुमार अंकलगी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहत होते.


नेमकं काय घडलं ?


रविवारी म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. मुलगा श्रवण हा शाळेला सुट्टी असल्यानं विंचूरवरून घरी कारकलला आला होता. दुपारी दीडच्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी शेततळ्यात पोहण्यासाठी गेले यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावं, यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधली होती. मात्र, दुर्दैवानं झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण, त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी कोणीच नव्हते.


नात,नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळ झाले तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नसल्यानं आजी महादेवी कोळी शेततळ्याकडे गेल्या असता श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले. आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढलं.


दोन्ही चिमुकले बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारासाठी मंद्रप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं . याचा अधिक तपास पोलिस हवालदार विठ्ठल बिराजदार हे करीत आहेत.


या घटनेमुळे अंकलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपूर्वीच या मुलांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. वडील नसल्यामुळे आई आणि आजीने मोठ्या कष्टाने या दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र, काळाने घाला घातल्यानं दोन्ही मुले एकाच वेळी हिरावली गेली. या घटनेमुळे औज मंद्रूपसह संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत

ST NCMC Card : एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने

Breaking News : पुणे पुन्हा हादरलं! ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आजोबांकडून नातीवर अत्याचार

पुणे : पुण्यातील नसरापूरमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता पुन्हा एकदा

Eknath Shinde : आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे”; न्यायालयात फाशीची मागणी करणार

SIT नेमणूक; दोन आठवड्यांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश, तपासावर उच्चस्तरीय देखरेख, पॅरोलवर सुटकेला सरकारचा

Pune Crime : अटकेची भीती अन् ७ लाख रुपयांचा चुना; पुण्यातील पोलिसांचे प्रताप

पुणे : भीती दाखवत एखाद्याकडून खंडणी वसुली केली जाते आणि पोलीस आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकतात, पण जर पोलीसच खंडणी