यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ दिवसांचे? - नियोजन सुरू; विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर परिषदेत आशिष जयस्वाल मांडणार अर्थसंकल्प

मुंबई : राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण २६ दिवसांचे असण्याची शक्यता असून, त्यापैकी सुट्ट्या वगळता २० दिवस प्रत्यक्ष कामकाज होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या तारखा अंतिम केल्या जातील.


संसदीय कार्य विभागाने तयार केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार २३ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असून, विधान परिषदेत ही जबाबदारी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल पार पाडणार आहेत. दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही धुरा स्वतः खांद्यावर घेतली आहे.


अर्थसंकल्पीय तयारी ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. किमान सहा महिन्यांपासून विविध योजना, तरतुदी, नव्या प्रस्तावांचा समावेश, तसेच ऐनवेळी उद्भवणाऱ्या विषयांसाठीची आर्थिक तरतूद यावर सखोल काम केले जाते. अजित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रक्रियेत सहभागी होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार असल्याने अंतिम टप्प्यात कोणते बदल होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात वाढ

मुंबई : अमेरिकेच्या विमानवहाक नौकेच्या दिशेने येत असलेले एक इराणी ड्रोन पाडण्यात आले आहे. ही बातमी अमेरिकेच्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२

भारतीय शेअर बाजार वधारला, बाजारात उत्साहाचे वातावरण

मुंबई : मुक्त व्यापार करारांच्या बाबतीत भारताची प्रगती उत्साहवर्धक आहे. युरोपियन युनियन सोबतच्या करारामुळे

महापौर, उपमहापौरांसह समित्यांच्या अध्यक्षांच्या सारथ्यासाठी वाहने सज्ज

महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओ सचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच

शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला

मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेली मुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम

Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला