धक्कादायक! टायगर पॉईंटवर मुंबईच्या मुलीने केली आत्महत्या; खरं कारण आलं समोर

पुणे : सोलो ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा १ फेब्रुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मृतदेह आढळून आला. लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट या परिसरात आढळून आलेल्या मुंबईतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. ४०० फूट खोल दरीत सापडलेल्या मृतदेहाच्या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू अपघाती नसून आत्महत्येचा असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे.


मृत तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पटी (वय १९) असे असून ती मुंबईतील रहिवासी होती. श्रेया ही नामांकित महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होती. श्रेयाला फिरण्याची आवड असल्याने ती लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी गेली होती. सुरुवातीला ही घटना अपघात किंवा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र घटनास्थळाची पाहणी, पंचनामा आणि इतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.


पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेया काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कौटुंबिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि वैयक्तिक समस्यांमुळे तिची मानसिक स्थिती अस्थिर झाल्याचे तपासात आढळले. फिरण्याची आवड असल्याने तिने घरी लोणावळ्यात ट्रेकिंगला जाते असे सांगून टायगर पॉइंटवर आत्महत्या केली.


घटनेनंतर शिवदुर्ग रेस्क्यू पथक, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे ३९० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला, घटनास्थळाच्या आसपास तिच्या वैयक्तिक बॅगेत ओळखपत्र, मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांना आढळले असून त्याआधारे तिच्या घरच्यांशी पोलिसांनी संपर्क साधला. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल आमी लॅपटॉप उपकरणे अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून तिच्या शेवटच्या हालचाली आणि संवादाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.


लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील पुरावे आणि परिस्थिती पाहता आत्महत्येचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, मृत्यूमागील सर्व पुरावे तपासल्यानंतरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या