धक्कादायक! टायगर पॉईंटवर मुंबईच्या मुलीने केली आत्महत्या; खरं कारण आलं समोर

पुणे : सोलो ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा १ फेब्रुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मृतदेह आढळून आला. लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट या परिसरात आढळून आलेल्या मुंबईतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. ४०० फूट खोल दरीत सापडलेल्या मृतदेहाच्या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू अपघाती नसून आत्महत्येचा असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे.


मृत तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पटी (वय १९) असे असून ती मुंबईतील रहिवासी होती. श्रेया ही नामांकित महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होती. श्रेयाला फिरण्याची आवड असल्याने ती लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी गेली होती. सुरुवातीला ही घटना अपघात किंवा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र घटनास्थळाची पाहणी, पंचनामा आणि इतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.


पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेया काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कौटुंबिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि वैयक्तिक समस्यांमुळे तिची मानसिक स्थिती अस्थिर झाल्याचे तपासात आढळले. फिरण्याची आवड असल्याने तिने घरी लोणावळ्यात ट्रेकिंगला जाते असे सांगून टायगर पॉइंटवर आत्महत्या केली.


घटनेनंतर शिवदुर्ग रेस्क्यू पथक, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे ३९० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला, घटनास्थळाच्या आसपास तिच्या वैयक्तिक बॅगेत ओळखपत्र, मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांना आढळले असून त्याआधारे तिच्या घरच्यांशी पोलिसांनी संपर्क साधला. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल आमी लॅपटॉप उपकरणे अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून तिच्या शेवटच्या हालचाली आणि संवादाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.


लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील पुरावे आणि परिस्थिती पाहता आत्महत्येचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, मृत्यूमागील सर्व पुरावे तपासल्यानंतरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा