धक्कादायक! टायगर पॉईंटवर मुंबईच्या मुलीने केली आत्महत्या; खरं कारण आलं समोर

पुणे : सोलो ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा १ फेब्रुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मृतदेह आढळून आला. लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट या परिसरात आढळून आलेल्या मुंबईतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. ४०० फूट खोल दरीत सापडलेल्या मृतदेहाच्या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू अपघाती नसून आत्महत्येचा असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे.


मृत तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पटी (वय १९) असे असून ती मुंबईतील रहिवासी होती. श्रेया ही नामांकित महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होती. श्रेयाला फिरण्याची आवड असल्याने ती लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी गेली होती. सुरुवातीला ही घटना अपघात किंवा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र घटनास्थळाची पाहणी, पंचनामा आणि इतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.


पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेया काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कौटुंबिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि वैयक्तिक समस्यांमुळे तिची मानसिक स्थिती अस्थिर झाल्याचे तपासात आढळले. फिरण्याची आवड असल्याने तिने घरी लोणावळ्यात ट्रेकिंगला जाते असे सांगून टायगर पॉइंटवर आत्महत्या केली.


घटनेनंतर शिवदुर्ग रेस्क्यू पथक, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे ३९० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला, घटनास्थळाच्या आसपास तिच्या वैयक्तिक बॅगेत ओळखपत्र, मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांना आढळले असून त्याआधारे तिच्या घरच्यांशी पोलिसांनी संपर्क साधला. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल आमी लॅपटॉप उपकरणे अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून तिच्या शेवटच्या हालचाली आणि संवादाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.


लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील पुरावे आणि परिस्थिती पाहता आत्महत्येचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, मृत्यूमागील सर्व पुरावे तपासल्यानंतरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा