Nilesh Rane and Sanjay Raut : एवढा नीचपणा बरा नव्हे...घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, निलेश राणेंनी बारामतीतून राऊतांचे काढले वाभाडे

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर १० दिवसांतच त्यांचा अपघात झाला, असा दावा करत संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. "अजितदादा नेहमी भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल सोबत ठेवायचे, अपघाताच्या वेळीही ती फाईल विमानात असावी," असे विधान राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मंगळवारी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, "अजितदादांना जाऊन अजून चार-पाच दिवसही झाले नाहीत, किमान अशा दुःखद प्रसंगी तरी घाणेरडे राजकारण करू नका." राऊतांनी माणुसकी जपण्याचा सल्लाही राणे यांनी यावेळी दिला.



एवढा नीचपणा बरा नव्हे...तिथली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक


"अजितदादांना जाऊन जेमतेम ३-४ दिवस झाले आहेत, किमान आतातरी राजकारण थांबवा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा हा नीचपणा आहे," अशा कडक शब्दांत निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. अजित पवार यांच्या निधनानंतर राऊत यांनी उपस्थित केलेल्या संशयास्पद तर्कांवरून राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. बारामती येथे पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर निलेश राणे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सगळीकडे राजकारण? काहीतरी भान ठेवा. अगोदर आपण माणूस आहोत, मग कोण राजकारणी, कोण खेळाडू आहे. सगळीकडे राजकारण बरोबर नाही. एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही. कुठेतरी स्तर राजकारणाला असला पाहिजे. कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजेत. मी त्यांच्या घरात जाऊन आलो आहे, तिथली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. घरातील कर्ता माणूस गेला आहे, पण संजय राऊत यांना त्याचे काहीच वाटत नाही. त्यांना साधी माणुसकीही दाखवता आली नाही. अंत्यविधीला न जाता केवळ टीव्हीवर बसून तर्क लावणे ही कोणती संस्कृती?" संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या 'भ्रष्टाचाराच्या फाईल'च्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले की, राऊत यांना कोणाच्या कुटुंबाबद्दल काही भावना आहेत का? राजकारणात कुठेतरी मर्यादा आणि स्तर असायला हवा. केवळ राजकारण करण्यासाठी मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करू नका, अशा शब्दांत त्यांनी राऊतांना फटकारले.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व