Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी माहिती हाती आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अर्चना पाटील सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक आहे. मागील दोन दिवसांपासून त्या मुंबईत होत्या. त्यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.


अजित पवार चार्टर विमानाने मुंबईहून बारामतीला चालले होते. या विमानाला सकाळी ८.४५ च्या सुमारास अपघात झाला. बारामती येथील धावपट्टीजवळ विमान कोसळले. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताआधी अजित पवारांनी फोन केला होता. ही माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी दिली आहे.


राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्ह्यात तेर गटामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर एनडीए आणि राज्य पातळीवर महायुतीत सहकारी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. याच संदर्भात बोलताना अर्चना पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.


अजित पवारांनी स्वतः फोन करुन मी येऊ शकत नाही, पण मंत्री दर्जाच्या माणसाला पाठवतो असे आश्वासन दिले होते, अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली.


पवार कुटुंबाला मोठं दुःख झालं आहे. सुनेत्रा आत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. निश्चित अभिमान आहे. तेरची मुलगी ही राज्याची उपमुख्यमंत्री झाली आहे. सुनेत्रा आत्यांनी यांनी ग्राऊंड लेव्हलवर काम केलं आहे. काटेवाडी निर्मल गाव योजना त्यांनी राबवली आहे. त्या कायम जितदादांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. लग्न झाल्यापासून मागील ४० वर्षांपासून त्या काम करत आहेत. महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे की, घर हे पुरुष आणि महिलेच्या नावावर असले पाहिजे. पण हा निर्णय २० वर्षांपूर्वी सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत राबवला होता. महिलेला घरातून बाहेर काढू नये, म्हणून सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत हा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची दखल घेऊन राज्य शासनाने तो पूर्ण महाराष्ट्रात अंमलात आणला आहे. त्यांना गोरगरिब महिलांची जाण आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहून आधार वाटतोय. सगळ्या महिला आशेनं पाहत आहेत; असंही अर्चना पाटील म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांचे वडील बाजीराव पाटील हे गावचे सरपंच होते. घरात लोक प्रश्न घेऊन यायचे. त्यामुळे त्यांनी घरात लोकांच्या समस्या कशा सोडवतात हे जवळून पाहिलं आहे. त्या जास्त बोलत जरी नसल्या तरी योग्य निर्णय घेण्यास त्या सक्षम आहेत, असंही अर्चना पाटील म्हणाल्या.

Comments
Add Comment

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)

Pune Crime :  पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; ६० ते ७० तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कथित रेव्ह पार्टीचा (Raid On Pune Rave Party) पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री

Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर