मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही - प्रफुल्ल पटेल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून विरोधकांकडून जाणीवपूर्वक चुकीचे नेरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप करत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत शपथविधी करण्यात आला आणि त्यासाठी आपण व सुनील तटकरे कारणीभूत असल्याचे आरोप तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांवर पटेल यांनी सविस्तर भाष्य केले.


प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही आणि असा कोणताही विचार माझ्या मनात नाही. अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, हे मी स्पष्टपणे सांगतो. आज आमच्यासमोर विलीनीकरणाचा विषय महत्त्वाचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता कोण असेल, हा पूर्णपणे आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.


सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना पटेल यांनी सांगितले की, सर्व भावना समजून घेऊनच हा निर्णय घेण्यात आला. पवार कुटुंबात तीन दिवसांचा दुखवटा असल्याची माहिती स्वतः सुनेत्रा पवार यांनी दिली होती. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना आहे.


आमच्याबाबत अनेकांकडून उलटसुलट वक्तव्य केली जात असून, राज ठाकरे किंवा अन्य कोणाचा आमच्या पक्षाशी काय संबंध, असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला. काहीजण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.



विलीनीकरण होणार का?


अजित पवार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाजूने होते, त्यादृष्टीने बैठकाही झाल्या, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. याविषयी पटेल म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढाव्यात, असा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता आणि त्याबाबत आमच्याशी चर्चा झाली होती. मात्र ही चर्चा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतीच मर्यादित असल्याचे अजित पवार यांनी अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे, असेही पटेल यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी